पंचक काळात मृत्यू झाल्यास काय काळजी घ्यावी?
गरुड पुराण आणि ज्योतिषशास्त्रात पंचक काळात झालेला मृत्यू अत्यंत अशुभ मानला जातो. अशी मान्यता आहे की, या काळात कोणाचा मृत्यू झाला तर कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये आणखी पाच मृत्यू होण्याची भीती असते. पंचकादरम्यान कोणाचा मृत्यू झाला तर शक्य असल्यास पंचक संपल्यावर अंत्यसंस्कार करावेत. पंचकमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याने त्या कुटुंबातील आणखी पाच जणांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली जाते. या दोषाला 'पंचक दोष' म्हणतात. जर कोणाचा या काळात मृत्यू झाला, तर काही खास खबरदारी घेणे अनिवार्य आहे.
advertisement
1. पुत्तल विधी: अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृत व्यक्तीच्या शवाशेजारी कुश किंवा पिठाचे पाच लहान पुतळे ठेवावेत. या पुतळ्यांची देखील मृतदेहाप्रमाणेच विधीवत पूजा करावी.
2. एकत्र दहन: अग्नी देताना त्या पाच पुतळ्यांनाही मृतदेहासोबतच मुखाग्नी द्यावा. असे केल्याने पंचक दोष समाप्त होतो आणि कुटुंबावरील संकट टळते, असे मानले जाते.
3. पंचक शांती विधी: अंत्यविधीनंतर एखाद्या विद्वान ब्राह्मणाकडून 'पंचक शांती' करून घ्यावी. यामुळे मृतात्म्याला सद्गती मिळते आणि वारसांना होणारा त्रास कमी होतो.
4. दक्षिण दिशा टाळा: पंचक सुरू असताना मृतदेह बाहेर काढताना किंवा अंत्ययात्रेच्या वेळी दक्षिण दिशेबाबतचे नियम कडकपणे पाळावेत.
5. दानधर्म: गरुड पुराणानुसार, मृताच्या नावाने या काळात अन्न, वस्त्र आणि तिळाचे दान केल्याने दोषाची तीव्रता कमी होते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
