खरं तर भारताचा पहिवाच सामना हा मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर होता. या सामन्याआधी टीम इंडिया प्रचंड चिंतेत होती.कारण टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू अभिषेक शर्मा हा तापाने फणफणलेला. वानखेडेच्या ड्रेसिंग रूममध्ये तो स्वेटर घालून बसला होता.त्याला असे स्वेटर घातलेले पाहून सगळेचे चिंतेत होते, असं सेजू सॅमसनने सांगितले आहे.
मला (अभिषेकला) त्यावेळी सगळ्या सिनिअर खेळाडूंनी सांगितलं की जर तु बरं वाटत नसेल तर एका सामन्यात ब्रेक घेऊन दुसऱ्या सामन्यात खेळ असे अनेकांनी सांगितले होते,असे अभिेषेक शर्माने सांगितले होते. त्यावेळी मला साधं उभा राहता येत नव्हतं. मी संजू भाईला विचारलं काय करू संजू म्हणाला तु खेळ.त्यानंतर मी हिम्मत दाखवली आणि गोळ्या घेऊन खेळलो.मला माझ्या मनासारखं खेळता आलं नाही पण मला आनंद वाटला की हिम्मत दाखवली असे अभिषेक शर्मा म्हणाला आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव 2026 मध्ये टीम इंडियाचे दोन्ही ओपनर बोलत होते.
दरम्यान वर्ल्डकपच्य पहिल्याच म्हणजेच युएसए विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला पहिल्याच बॉलला कॅच आऊट झाला होता.त्यानंतर इतर खेळाडूंनी देखील विकेट फेकल्या होत्या.त्यात कॅप्टन सूर्याने 49 बॉलमध्ये 84 धावांची वादळी खेळा केली होती.या खेळीच्या बळावर भारताने 161 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना युएसए 132 धावा करू शकली होती,त्यामुळे भारताने हा सामना 29 धावांनी जिंकला होता.
