TRENDING:

भारत-पाकिस्तानमध्ये फायनलआधी पुन्हा राडा, अर्शदीपच्या Video ने मिर्च्या झोंबल्या, PCB गेली ICC च्या दारात

Last Updated:

IND vs PAK Asia Cup Final भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपमधील वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. फायनलआधी पीसीबीने भारताचा फास्ट बॉलर अर्शदीप सिंगच्या विरोधात आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपमधील वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. पहिल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही, त्यामुळे पीसीबीने आयसीसीकडे तक्रार दाखल केली. यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनी मैदानात वादग्रस्त सेलिब्रेशन केली, यानंतर बीसीसीआयनेही पाकिस्तानी खेळाडूंविरुद्ध आयसीसीकडे तक्रार दाखल केली. यानंतर आता फायनलआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची पुन्हा एकदा रडारड सुरू झाली आहे. पीसीबीने भारताचा फास्ट बॉलर अर्शदीप सिंगच्या विरोधात आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये फायनलआधी पुन्हा राडा, अर्शदीपच्या Video ने मिर्च्या झोंबल्या, PCB गेली ICC च्या दारात
भारत-पाकिस्तानमध्ये फायनलआधी पुन्हा राडा, अर्शदीपच्या Video ने मिर्च्या झोंबल्या, PCB गेली ICC च्या दारात
advertisement

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अर्शदीप सिंगवर अश्लिल इशारे केल्याचा आरोप केला आहे. अर्शदीप सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, या व्हिडिओवरूनच पीसीबीला मिर्च्या झोंबल्या आहेत. याआधी पीसीबीने टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचीही तक्रार दाखल केली होती.

पीसीबीचे अर्शदीपवर आरोप

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत-पाकिस्तानमध्ये 21 सप्टेंबरला झालेल्या सुपर-4 मॅचवेळच्या घटनेनंतर पीसीबीने तक्रार केली आहे. अर्शदीप सिंगने प्रेक्षकांकडे पाहून अश्लिल इशारे केल्याचा आरोप पीसीबीने केला आहे. अर्शदीपने अश्लिल इशारे करून आयसीसीच्या आचार संहितेचं उल्लंघन केल्याचा पीसीबीचा दावा आहे. अर्शदीपचं वर्तन बेजबाबदारपणाचं आणि खेळ भावनेला ठेच पोहोचवणारं आहे, त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीसीबीने केली आहे.

advertisement

PCB ने केली सूर्याचीही तक्रार

अर्शदीप सिंगच्या आधी पीसीबीने टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचीही तक्रार दाखल केली होती. सूर्यकुमार यादवने क्रिकेटमध्ये राजकारण आणल्याचा आरोप करत पीसीबीने आयसीसीकडे तक्रार दाखल केली. आशिया कपमधल्या पहिल्या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त केला होता, तसंच भारतीय लष्कराचं कौतुकही केलं होतं.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
भारत-पाकिस्तानमध्ये फायनलआधी पुन्हा राडा, अर्शदीपच्या Video ने मिर्च्या झोंबल्या, PCB गेली ICC च्या दारात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल