बांग्लादेशने दिलेल्या 291 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सूरूवात खूपच खराब झाली होती.कारण पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर साहिबजादा फरहान आणि माज सदाकत प्रत्येकी 6 धावांवर बाद झाले होते.त्यानंतर गाजी घोरी आणि मोहम्मद रिझवान मैदानात आला होता. दोघेही डाव सावरतील असे वाटत होते, पण मोहम्मद रिझवान 4 धावांवर बाद झाला होता.त्याच्यानंतर अब्दुल समद मैदानात आला. पण गाजी घोरी 29 वर बाद झाला.
advertisement
त्यानंतर सलमान आघाची मैदानात एंन्ट्री झाली.त्याने अब्दुल समदसोबत पाकिस्तानचा डाव सावरला होता. पण नंतर तो 34 वर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ साद मसूद 38 वर तर फहीम अश्रम 9 वर बाद झाला होता. दरम्यान एका मागून एक विेकेट पडत असताना सलमान आगाने पाकिस्तानचा डाव सावरत 89 बॉलमध्ये सेंच्यूरी ठोकली होती. ही त्याची वनडेतली तिसरी सेंच्यूरू होती. या सेंच्यूरीनंतर तो सैामना जिंकवेल असे वाटत होते त्याच्या जोडीला पाकिस्तानचा कॅप्टन शाहिन शाह आफ्रिदी होता.दोघांनी मिळून सामना अटीतटीचा केला होता.कारण शाहिन शाह आफ्रीदी खुपच हळू खेळत होता आणि सलमान आघाला स्ट्राईकच देत नव्हता.त्यात स्ट्राईक मिळताच सलमान मोठा शॉर्ट खेळायला गेला आणि 106 धावांवर आऊट झाला होता.
आघा आऊट झाल्यानंतर पाकिस्तानचा 14 बॉल 30 धावा हव्या होत्या. त्यातल्या सुरुवातीच्या आठ बॉलमध्ये पाकिस्तानने 15 धावा काढल्या.त्यानंतर शेवटच्या ओव्हरला 14 धावा हव्या होत्या. यावेळी रिषाद होसनने आफ्रीदीला मारायची एकही संधी दिली नसल्याने त्या ओव्हरला फक्त 2 धावा आल्या आणि पाकिस्तानने हा सामना 11धावांनी हारला.आणि विजयसह बांग्लादेशने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने जिंकली.
बांग्लादेशच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर तांजिद तमीमच्या 107 धावांच्या शतकीय आणि तौहीद हृदोयच्या 48 धावांच्या बळावर बांग्लादेशने 50 ओव्हरमध्ये 290 धावा केल्या होत्या.यावेळी पाकिस्तानकडून हॅरीस रौफने 3,शाहिन आफ्रिदी आणि अबरार अहमदने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
