संजू सॅमसनला जादू की झप्पी
संजू सॅमसनने नाबाद 97 धावांची मॅच विनिंग खेळीमुळे टीम इंडियाने सामना जिंकला. त्यामुळे कोलकाताच्या मैदानावर गंभीर भलताच खुश झाला. गंभीरने मैदानात येताच संजू सॅमसनला जादू की झप्पी दिली. तर इतर खेळाडूंनी देखील संजूचं तोंडभरून कौतूक केलं. टीम इंडियाचा चेता पहिल्यांदाच धहाडला सेमीफायनलला घेऊन गेला. पण त्याचवेळी गंभीर अभिषेक शर्मावर नाराज असल्याचं पहायला मिळतंय. अभिषेक आऊट झाल्यावर गंभीरने खुन्नस दिली होती.
advertisement
गंभीरने रागात अभिषेककडं पाहिलं
टीम इंडियाला मैदानात दोन्ही सलामीविरांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण अभिषेक शर्माने टीम इंडियाला दगा दिला. अभिषेक अवघ्या 10 धावा करून बाद झाला होता. अभिषेकची ही बॅटींग पाहून डगआऊटमध्ये बसलेला गंभीर प्रचंड नाराज झाला होता. अभिषेक डगआऊटच्या दिशेने येत असताना गंभीरने तोंड पाडून रागात अभिषेककडं पाहिलं. तर प्रेस कॉन्फरेनमध्ये गंभीरने अभिषेकचं नाव देखील घेतलं नाही.
अभिषेकचं नावही घेतलं नाही
टीम इंडियाची सलामीवीर जोडी अनेकदा बदलावी लागली आहे, त्यामुळे इंग्लंडविरुद्ध देखील अशीच रणनिती असणार का? असा सवाल गंभीरला जेव्हा विचारला गेला. त्यावेळी त्याने थेट अभिषेकचं नाव घेणं देखील पसंत केलं नाही. संजू सॅमसन आणि इशान किशन यांची चांगली कामगिरी करून दाखवलीये. त्यामुळे आम्हाला टॉप ऑर्डरची चिंता नाही, असं गंभीर म्हणाला होता. त्यामुळे अभिषेकच्या कामगिरीवर गौतम गंभीर नाराज असल्याचं पहायला मिळत आहे.
