नेमकं काय प्रकरण?
या सगळ्यावर गौतम गंभीरने थेट उत्तर देऊन माजी खासदारालाच झापलं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने जवळच्याच हनुमान मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला आणि सोबत वर्ल्ड कपची ट्रॉफीही नेली. यावर बोलताना खासदार कीर्ति आझाद म्हणाले होते की, "खेळ हा कोणत्याही धर्म किंवा जातीचा नसतो. १४० कोटी भारतीयांच्या श्रद्धेचा हा विषय आहे, त्याला धार्मिक स्वरूप देऊ नये."
advertisement
गौतम गंभीरने माजी खासदाराला झापलं
टीएमसी खासदाराने केलेल्या या टीकेवर बोलताना गौतम गंभीरचा पार चढला. "या टीकेला उत्तर देणेही मी गरजेचे समजत नाही. हा संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. जर कोणी अशा प्रकारे टीका करत असेल, तर तो त्या १५ खेळाडूंच्या मेहनतीचा आणि त्यांच्या यशाचा अपमान आहे. दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर या मुलांनी जे दडपण झेलले आणि त्यानंतर हे यश मिळवले, त्याचं मूल्य अशा विधानांनी कमी होतं. हे खेळाडूंवर अन्याय करण्यासारखं आहे."
हरभजन सिंगनेही ओढले ताशेरे
गंभीरचा खासदार हरभजन सिंगनेही कीर्ति आझाद यांच्यावर टीका केली आहे. "ट्रॉफी मंदिरात नेण्याच्या घटनेला राजकीय रंग देणे अत्यंत दुर्दैवी आहे. कीर्ति आझाद स्वतः एक क्रिकेटपटू आहेत, त्यांच्याकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती. कदाचित ते खेळापेक्षा राजकारणाला जास्त महत्त्व देत असावेत," असे हरभजनने ठणकावून सांगितले.इशान किशननेही मी यावर काय बोलू असं म्हणत या टीकेला प्रत्युत्तर देणं महत्त्वाचं मानलं नाही. तुम्ही चुकीचा प्रश्न विचारला असंही म्हणाला आहे.
कीर्ती आझाद यांना ट्रोल केले आहे. तर काहींनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य असल्याचं ट्विट करून प्रतिक्रिया दिली. मात्र या सगळ्यालाच गौतम गंभीरने खेळाडूंचा अपमान तुम्ही करता असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. खेळाडूंच्या मेहनतीला तुम्ही दुय्यम करता. हे यश टीमसाठी भारतासाठी फार मोलाचं आहे. त्यामुळे यावरुन राजकारण करणं चुकीचं असल्याचंही गंभीरने म्हटलं आहे.
