TRENDING:

Team India : T20 वर्ल्ड कप 91 दिवसांवर, पण... 5 जणांची जागा धोक्यात, ऑस्ट्रेलियात जिंकूनही सूर्या टेन्शनमध्ये!

Last Updated:

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पाचवा टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला. याचसोबत भारताने ही टी-20 सीरिज 2-1 ने जिंकली. सीरिजमध्ये विजय मिळवला असला तरी या सीरिजमुळे टीम इंडियामधल्या अडचणीही समोर आल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पाचवा टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला. याचसोबत भारताने ही टी-20 सीरिज 2-1 ने जिंकली. सीरिजमध्ये विजय मिळवला असला तरी या सीरिजमुळे टीम इंडियामधल्या अडचणीही समोर आल्या आहेत. 2026 चा टी-20 वर्ल्ड कप भारतामध्ये होणार आहे, 7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कप सुरू व्हायची शक्यता आहे, ज्याला आता फक्त 91 दिवस शिल्लक आहेत. टी-20 वर्ल्ड कप इतक्या जवळ आलेला असताना भारतीय खेळाडूंचा फॉर्म कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीरसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
T20 वर्ल्ड कप 91 दिवसांवर, पण... 5 जणांची जागा धोक्यात, ऑस्ट्रेलियात जिंकूनही सूर्या टेन्शनमध्ये!
T20 वर्ल्ड कप 91 दिवसांवर, पण... 5 जणांची जागा धोक्यात, ऑस्ट्रेलियात जिंकूनही सूर्या टेन्शनमध्ये!
advertisement

शुभमन गिलचा संघर्ष

आशिया कपपासून शुभमन गिलचं भारताच्या टी-20 टीममध्ये पुनरागमन झालं, पण त्यानंतरच्या एकाही टी-20 सामन्यात त्याला अर्धशतक करता आलं नाही. गिलला आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात शेवटचं अर्धशतक करून वर्षभरापेक्षा जास्त काळ झाला आहे. तसंच ओपनर असलेला गिल पॉवर प्लेमध्ये ज्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतो, त्यामुळेही टीमची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

advertisement

तिलक वर्माला डच्चू

या संपूर्ण सीरिजमध्ये तिलक वर्माची बॅट शांत राहिली, त्यामुळे पाचव्या टी-20 सामन्यासाठी त्याला बाहेर ठेवण्यात आलं. मागच्या काही काळापासून तिलक वर्माला वेगवेगळ्या क्रमांकावर बॅटिंग करावी लागली आहे, याचा फटकाही त्याला बसला आहे. शुभमन गिलचं टीममध्ये कमबॅक झाल्यानंतर भारताच्या मिडल ऑर्डरमध्ये बरेच बदल करावे लागले आहेत.

सूर्यकुमार यादवची बॅटही शांत

advertisement

मागच्या काही काळापासून सूर्यकुमार यादवचा फॉर्मही टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला आहे. तिलकप्रमाणेच सूर्यकुमार यादवलाही त्याचा बॅटिंग क्रमांक बदलावा लागला. कधी तो तिसऱ्या तर कधी चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला, पण कोणत्याच क्रमांकावर त्याला धमाकेदार कामगिरी करता आली नाही.

संजूचा रोल काय?

गिलचं कमबॅक झाल्यानंतर तो ओपनिंगला खेळायला लागला, त्यामुळे संजू सॅमसनला मिडल ऑर्डरमध्ये खेळावं लागलं, पण या क्रमांकावर संजूलाही संघर्ष करावा लागला आहे, त्यामुळे संजूलाही त्याचं टीममधलं स्थान गमवावं लागलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विकेट कीपर म्हणून जितेश शर्माला खेळण्याची संधी मिळाली.

advertisement

हार्दिकचा कमबॅक, बाहेर कोण?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ती खरंच 'भाग्यलक्ष्मी' होती, पैसा आला! गायीला वाजत गाजत दिला अखेरचा निरोप, VIDEO
सर्व पहा

आशिया कपवेळी हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये खेळू शकला नाही, पण हार्दिक पांड्याचं कमबॅक झाल्यानंतर कोणत्या खेळाडूला बाहेर बसावं लागणार? याचा कठोर निर्णय सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरला घ्यावा लागणार आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : T20 वर्ल्ड कप 91 दिवसांवर, पण... 5 जणांची जागा धोक्यात, ऑस्ट्रेलियात जिंकूनही सूर्या टेन्शनमध्ये!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल