सुनील गावसकरांचा ईसीबीवर निशाणा
भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर म्हणाले की प्रेझेन्टेशन वेळी पतौडी कुटुंबातील कोणालाही तिथे बोलावले नव्हते. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हटले होते की ही सीरिज जिंकणाऱ्या टीमच्या कर्णधाराला पतौडी ट्रॉफी दिली जाईल, परंतु जेव्हा मालिका 2-2 अशी बरोबरीत होती, तेव्हा त्यांच्या निर्णयाला काही अर्थ नव्हता. गावसकर पुढे म्हणाले की, जर सीरिज अशीच बरोबरीत राहिली तर या पदकाचा काही उपयोग नाही. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या विजेत्याला पतौडी ट्रॉफी देणे हा निर्णय अधिक चांगला असता.
advertisement
सुनील गावस्कर यांनी केवळ या प्रकरणावरूनच नव्हे तर सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांना प्रेझेन्टेशनसाठी आमंत्रित न केल्याबद्दल ईसीबीवर निशाणा साधला. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी नावाची ही पहिली सीरिज होती. माझ्या माहितीनुसार, दोन्ही खेळाडू मालिकेदरम्यान तिथे उपस्थित होते. प्रेझेन्टेशन सेरेमनीला त्यांना आमंत्रित केले असते तर बरे झाले असते. त्यांना का आमंत्रित केले नाही? असा प्रश्न गावसकरांनी विचारला.
भारत-इंग्लंड सीरिज ड्रॉ
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टेस्ट सीरिज 2-2 अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडने पहिला आणि तिसरा सामना जिंकला. तर भारताचा दुसऱ्या आणि पाचव्या सामन्यात विजय झाला. दोन्ही टीममधील चौथा टेस्ट ड्रॉ झाली.
