नेमकं काय झालं?
श्रीलंकेच्या डावातील चौथ्या बॉलवर दासुन शनाकाला अर्शदीप सिंगच्या बॉलवर कॉट-बिहाइंड आउट देण्यात आलं. अंपायरने बोट वर करताच, शनाकाने DRS घेतला आणि धावण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, त्याआधीच अलर्ट विकेटकीपर संजू सॅमसनने थेट स्टंप्सवर थ्रो मारून त्याला रन आउट केलं. भारताचे खेळाडू दुहेरी विकेट मिळाल्याच्या आनंदात होते, पण तिसऱ्या अंपायरने शनाकाला 'नॉट आउट' घोषित केलं.
advertisement
अंपायर फलंदाजाला 'आउट' देतो तेव्हा...
अंपायरने नॉट आऊट दिल्यानतंर सूर्याने थेट ऑन फिल्ड अंपायरला धरलं अन् नेमका विषय काय विचारला. अंपायर गाझी सोहेल यांनी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला नियम समजावून सांगितला. नियमानुसार (MCC Law 20.1.1.3), जेव्हा ऑन-फिल्ड अंपायर फलंदाजाला 'आउट' देतो, तेव्हा त्याच क्षणी बॉल डेड (Ball is Dead) होतो. त्यामुळे, कॉट-बिहाइंडचा निर्णय DRS मध्ये 'नॉट आउट' ठरला असला तरी, बॉल डेड झाल्यामुळे, त्यानंतर झालेला रन आउट ग्राह्य धरला गेला नाही.
पहिल्याच बॉलवर तीन धावा
दरम्यान, या रोमांचक मॅचमध्ये श्रीलंकेच्या पथुम निसंकाचे मॅग्निफिसेंट शतक (107 धावा) व्यर्थ ठरले. सुपर ओव्हरमध्ये भारताचा लेफ्ट-आर्म पेसर अर्शदीप सिंगने फक्त 2 धावा देत श्रीलंकेचे दोन गडी बाद केले. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्याच बॉलवर तीन धावा घेत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला आणि आशिया कप फायनलमध्ये प्रवेश केला.
पाहा Video
इरफान पठाणने सांगितला नियम
बॉल विकेटकीपर संजूने पकडल्यानंतर रिव्ह्यू घेण्यात आला आणि त्यामुळे बॉल डेड झाला आणि अंपायर गाजी सोहेल आपला मुद्दा टीम इंडियाला कळवतात. पण पहिला निर्णय नेहमीच मान्य असतो आणि जेव्हा अंपायरने तो आउट देतो तेव्हा बॉल डेड होतो आणि म्हणूनच शनाका रनआऊट होण्यापासून वाचला, असं इरफान पठाण याने म्हटलं आहे.