भारतीय क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा विश्वचषकाचा गुलाल उधळला गेला, तेव्हा तेव्हा दक्षिण टोकाच्या केरळ राज्याचा एक 'दुवा' संघात असणे, हा आता एक अलौकिक योगायोग बनला आहे. 2007, 2011 आणि आता 2026 च्या विश्वविजयी गाथेत हे साम्य थक्क करणारे आहे.
भारतीय क्रिकेटच्या विश्वविजेतेपदाचा इतिहास आणि 'केरळ कनेक्शन' यांचा एक अजब योगायोग पुन्हा एकदा 2026 मध्ये पाहायला मिळाला. 2007 आणि 2011 मध्ये श्रीशांतने गाजवलेल्या मैदानानंतर, आता संजू सॅमसनने अहमदाबादमध्ये ऐतिहासिक खेळी करत केरळच्या खेळाडूचा संघात असणे भारतासाठी 'लकी चार्म' असल्याचे सिद्ध केले आहे.
advertisement
2007 चा पहिला टी-20 वर्ल्डकप: श्रीशांतची तो कॅच!
2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत जेव्हा पहिला टी-20 विश्वचषक खेळला गेला, तेव्हा भारतीय संघात केरळचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत होता. जोहान्सबर्गच्या फायनलमध्ये पाकिस्तानच्या मिसबाह-उल-हकचा तो ऐतिहासिक कॅच श्रीशांतनेच पकडला आणि भारत पहिल्यांदा विश्वविजेता झाला. त्यावेळी कर्णधार होते महेंद्रसिंग धोनी.
2011 चा वनडे वर्ल्डकप: वानखेडेवर श्रीशांतची एन्ट्री
28 वर्षांनंतर भारताने जेव्हा 2011 मध्ये घरच्या मैदानावर एकदिवसीय विश्वचषक जिंकला, तेव्हाही श्रीशांत संघात होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, श्रीशांतला अंतिम सामन्यात (फायनलमध्ये) खेळण्याची संधी मिळाली होती. वानखेडेवर श्रीशांत संघात होता आणि भारताने श्रीलंकेला हरवून कप उंचावला. याही वेळी 'कॅप्टन कूल' धोनीच होता.
2026 चा टी-20 वर्ल्डकप: संजू सॅमसनचा 'अहमदाबाद' धमाका!
आता 2026 मध्ये भारताने पुन्हा एकदा टी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे यावेळीही संघात केरळचा संजू सॅमसन महत्त्वाच्या भूमिकेत होता. संजूने 2026 च्या फायनलमध्ये 89 धावांची ऐतिहासिक खेळी करून भारताला विश्वविजेता बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला. संजूने फक्त फायनल नाही तर त्याआधी सेमीफानल आणि सुपर-8मध्ये वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात महत्त्वाची खेळी केली होती.
