काय म्हणाले Mohsin Naqvi?
जर युद्ध तुमच्या अभिमानाचे माप असेल, तर इतिहासात पाकिस्तानकडून झालेल्या अपमानास्पद पराभवांची नोंद आहे. कोणताही क्रिकेट सामना हे सत्य पुन्हा लिहू शकत नाही. खेळात युद्ध ओढल्याने केवळ निराशाच उघड होतं आणि खेळाच्या आत्म्याला कलंकित करतं, असं म्हणत मोहसिन नक्वी यांनी नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर देण्याती हिंमत केली आहे.
advertisement
नरेंद्र मोदींनी ट्विट करत काय म्हटलं होतं?
रोमहर्षक सामन्यात भारताने 5 गडी राखून विजय मिळवला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या विजयावर खास ट्वीट केलं. हॅशटॅक ऑपरेशन सिंदूर हे मैदानात सुद्धा सुरूच आहे. मैदानात सुद्धा तेच उत्तर मिळालं, भारताचा विजय झाला, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी भारतीय टीमचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हटके शुभेच्छा दिल्यानंतर सोशल मीडियावर एकच धुरळा उडाला. पाकिस्तानच्या टीमला आता ट्रोल केलं जात आहे.
दरम्यान, दोन्ही देशातील राजकीय संबंध ताणले असताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी युएनमध्ये भारतावर टीका करण्याची संधी सोडली नाही. त्याला भारताने देखील चांगलंच प्रत्युत्तर दिलं. अशातच मोदींनी सॉफ्ट पावरचा वापर करत पाकिस्तानला पुन्हा एकदा धडा शिकवला. टीम इंडिया जिंकल्यानंतर मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला अन् पाकिस्तानला पुन्हा जागा दाखवून दिली.