या विजयाचा खरा शिल्पकार आकिब नबी ठरला असून, त्याने या मॅचमध्ये एकूण 9 विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट्स घेत बंगालचे कंबरडे मोडले. आकिबसोबतच सुनील कुमारनेही दुसऱ्या इनिंगमध्ये 27 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या, ज्यामुळे बंगालचा दुसरा डाव अवघ्या 99 रन्सवर गडगडला. आकिब आणि सुनीलच्या भेदक माऱ्यासमोर बंगालचे बॅट्समन पूर्णपणे हतबल झाल्याचे पाहायला मिळाले.
advertisement
बॅटिंगमध्ये अब्दुल समदने मोलाची कामगिरी केली. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 82 रन्सची शानदार खेळी केली, तर दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 30 रन्स काढून टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 17 फेब्रुवारी रोजी हा सामना एकतर्फी झाला आणि जम्मू-काश्मीरने विजयासाठी आवश्यक असलेले रन्स वंशज शर्माच्या नाबाद 43 रन्सच्या जोरावर सहज पूर्ण केले. तिसऱ्या दिवसाअखेर टीमला विजयासाठी केवळ 83 रन्सची गरज होती, जी त्यांनी चौथ्या दिवशी सकाळीच पूर्ण केली.
बंगालच्या टीमकडून मोहम्मद शमीने जोरदार कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 90 रन्स देऊन 8 विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 1 विकेट मिळवली. शमीने एकूण 9 विकेट्स घेऊन आपण अजूनही फॉर्मात असल्याचे दाखवून दिले, मात्र त्याची ही वैयक्तिक कामगिरी बंगालला फायनलचे तिकीट मिळवून देण्यात अपयशी ठरली. या कामगिरीमुळे शमीने पुन्हा एकदा भारतीय टीममध्ये निवडीसाठी आपला दावा मजबूत केला आहे.
