पाकिस्तान आणि बांगलादेशला टोला
आयसीसीचा वर्ल्ड कप महत्त्वाचा होता. कारण टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या आधी चर्चा चालू होती की, ही टीम खेळेल की नाही खेळेल. वर्ल्ड कप कसा होणार? पण ऑर्गनायझेशनपेक्षा मोठी कोणतीही टीम नसते. सर्व टीम मिळून ऑर्गनायझेशन तयार होते. कोणा एका टीममुळे ऑर्गनायझेशन नसते, असं म्हणत जय शहा यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशला टोला लगावला.
advertisement
मी सूर्याला एकच मेसेज देऊ इच्छितो की...
असोसिएटस देशांनी चांगला खेळ दाखवला. युएसएने टीम इंडियाला टफ फाईट दिली. झिम्बॉब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवलं. नेदरलँडने पाकिस्तानला अडचणीत आणलं. त्यामुळे असोसिएटस देशांनी अप्रतिम खेळ दाखवलाय. मी गेल्या 17 वर्षापासून क्रिकेट अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये आहे. मी सूर्याला एकच मेसेज देऊ इच्छितो की, टॉपवरून बॉटमला येयला खूप वेळ लागत नाही. पण बॉटमवरून टॉपवर येयला खूप वेळ लागतो. तुम्हाला आता फक्त आहे त्या जागी स्टेबल रहायचं आहे.
तुम्हाला 2036 ची तयारी करायचीय
तुम्ही मेहनत करत रहा, तुम्हाला अवॉर्ड मिळत नाही. मी बीसीसीआयमध्ये होतो तेव्हा 2028 च्या ऑम्पिक्सपर्यंतची तयारी केली होती. पण तुम्हाला 2030 ची तयारी करायचीये, तुम्हाला 2032 ची तयारी करायचीये आणि विशेष करून तुम्हाला 2036 ची तयारी करायची आहे, असं जय शहा म्हणाले. 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक्स आयोजित केलं जाणार आहे. त्यात क्रिकेटचा समावेश असेल. त्यासाठी जय शहा यांनी तयारी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
