खरं तर टी20 वर्ल्ड कप दरम्यान बांगलादेश टीमची हकालपट्टी केल्यानंतर पाकिस्तानने त्यांना पाठिंबा देण्यासाठी भारताविरूद्ध सामन्यावर बहिष्काराची भूमिका घेतली होती. त्यामुळे वर्ल्ड कप सूरू असताना पाकिस्तानने मोठा ड्रामा केला होता. पाकिस्तानच्या या ड्राम्यानंतर शेवटी ते भारताविरूद्ध खेळण्यास तयार झाले आहेत.ज्यामध्ये भारताने बांगलादेशचा पराभव केला होता.
दरम्यान पाकिस्तानच्या या ड्राम्यावर आतापर्यंत जय शहा काहीच बोलले नव्हते. पण आता CNBC TV18 च्या इडिया बिझनेस लीडर्स अवॉर्ड सोहळ्यात जय शाहा यांनी पाकिस्तान आणि बांग्लादेशला सुनावलं आहे.
advertisement
वर्ल्ड कप सूरू होण्याआधी चर्चा करत होते, ही (पाकिस्तान) टीम खेळणार की नाही, त्यामुळे वर्ल्डकप कसा होणार? असा प्रश्न होता.पण आयसीसीचा अध्यक्ष म्हणून मी सांगतो, ऑर्गनायझेशन पेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाहीी आहे.एका टीमने ऑर्गनायझेशन बनत नाही, सगळ्या टीम बनून ऑर्गनायझेशन बनते,अशा शब्दात जय शाहा यांनी पाकिस्तान बांगलादेशला सुनावलं.
वर्ल्ड कपमध्ये यावेळी व्युवरशीपचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. इतिहासात पहिल्यांदाच 7.2 मिलियन्स व्हुस आले होते.त्यामुळे हा वर्ल्डकप खुप महत्वपुर्ण म्हणून समोर आला.
2019 ला मी बीसीसीआय जॉईन केलं होतं.तेव्हापासून म्हणजेच 2019 ते 2026 या सात वर्षात टीम इंडियाने दोन अंडर 19 मेन्स वर्ल्डकप,दोनदा अंडर 19 वुमेन्स वर्ल्ड कप, दोनदा रनरअप WTC फायनलला,एक बार वनडेत रनरअप, दोनदा कॉन्झिक्युटीव्ह टी20 चॅंम्पियनशीप आणि 2025 ला चॅम्पियनशीप ही खूप मोठी गोष्ट आहे,असे जय शहा सांगतात.क्रिकेटमध्ये एक वेळ अशी होती की ऑस्ट्रेलिया जिंकायची पण आता भारत म्हणजे विजय असं आता झालं आहे.
