TRENDING:

IND vs PAK : पाकिस्तानला पुन्हा लायकी दाखवली… टीम इंडियाने सामना जिंकलाच, पण 'नो हँडशेक' ड्रामा सुरूच!

Last Updated:

हाँगकाँग सिक्सेस 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये एक रोमांचक सामना झाला. पावसामुळे सामना लवकर संपला, परंतु डकवर्थ-लुईस पद्धतीने भारताने 2 धावांनी विजय मिळवला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IND vs PAK : हाँगकाँग सिक्सेस 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये एक रोमांचक सामना झाला. पावसामुळे सामना लवकर संपला, परंतु डकवर्थ-लुईस पद्धतीने भारताने 2 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानला हरवल्यानंतर, दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पुन्हा एकदा देश प्रेम दाखवत नो हँडशेक पद्धत सुरूच ठेवली. भारताने सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंशी हात मिळवणं टाळलं.
News18
News18
advertisement

दोन्ही संघातील खेळाडूंनी हस्तांदोलन केले नाही

भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंमध्ये क्रीडाभावनेवरून अशी परिस्थिती निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, आशिया कप दरम्यान, सूर्यकुमार यादवने नाणेफेकीच्या वेळी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. त्यानंतर, 2025 च्या महिला विश्वचषकात, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. आता, दिनेश कार्तिकच्या संघाने हाँगकाँग सिक्सेसमध्येही असेच केले.

advertisement

टीम इंडियाने सामना जिंकला

हाँगकाँगमधील टिन क्वाँग रोड रिक्रिएशन ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या सहा षटकांच्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 86 धावा केल्या. भारताकडून रॉबिन उथप्पाने सर्वाधिक 28 धावा केल्या, त्याने 11 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकार मारले. भरत चिपलीने 24 धावांचे योगदान दिले आणि कर्णधार दिनेश कार्तिकने 17 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून मोहम्मद शहजादने दोन बळी घेतले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
काठीला घुंगरू बांधा, बॅटरी सोबत ठेवा, पुण्यातील या भागात धोका वाढला, कारण समोर
सर्व पहा

87 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने तीन षटकांत 41 धावा केल्या आणि एक विकेट गमावली. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबला आणि पाकिस्तानला विजयासाठी 18 चेंडूत 46 धावांची आवश्यकता होती. ख्वाजा नाफेयने 19 धावा केल्या आणि माझ सदाकतने 7 धावा केल्या. अब्दुल समदने 16 धावा केल्या. पावसामुळे सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही तेव्हा डीएलएस नियमानुसार भारताला विजयी घोषित करण्यात आले.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : पाकिस्तानला पुन्हा लायकी दाखवली… टीम इंडियाने सामना जिंकलाच, पण 'नो हँडशेक' ड्रामा सुरूच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल