TRENDING:

IPL 2026 : सॅमसनच्या एक्झिटमुळे राजस्थानला टेन्शन! जड्डू नाही तर 'या' दोन खेळाडूंच्या भरोशावर खेळणार आयपीएल

Last Updated:

Rajasthan Royals On Sanju Samson Importance : सॅमसनच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली, ती भरून काढण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IPL 2026 Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्स संघाचा महत्त्वाचा प्लेयर आणि विकेटकीपर संजू सॅमसनने संघ सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या नियोजनात मोठी पोकळी निर्माण झाली असणार, यात शंका नाही. सॅमसनसारखा महत्त्वाचा भारतीय विकेटकीपर गमावल्यानंतर संघाचा समतोल राखण्यासाठी टीमृच्या पडद्यामागील चर्चा काय होती आणि ही जागा कशी भरून काढली गेली, याबाबत संघाच्या व्यवस्थापनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संजू हा नक्कीच एक उत्कृष्ट प्लेयर होता आणि तो संघाचा एक महत्त्वपूर्ण सदस्य होता, असं राजस्थान रॉ़यल्सने म्हटलंय.
Rajasthan Royals On Sanju Samson Importance
Rajasthan Royals On Sanju Samson Importance
advertisement

सॅमसनच्या एक्झिटमुळे राजस्थान रॉयल्सच्या रणनीतीवर परिणाम

सॅमसन संघातून बाहेर पडल्यामुळे अनेक गॅप निर्माण झाला होता, हे मॅनेजमेंटने मान्य केलं. 2021 मध्ये सुरू केलेल्या प्रक्रियेमुळे संघाला कोणत्या प्रकारच्या प्लेयरची गरज आहे आणि मॅच जिंकण्यासाठी कोणती प्रोफाईल आवश्यक आहेत, याची चांगली समज आहे. सॅमसनच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली, ती भरून काढण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यत: त्याला ट्रेड बाहेर जाण्याची परवानगी देताना, संघातील इतर कमतरता दूर करण्याचा प्रयत्न टीमने केला.

advertisement

ध्रुव जुरेल आणि वैभव सूर्यवंशीमुळे मिळाली मदत

संजू सॅमसनच्या जाण्यामुळे आलेले मोठे आव्हान पेलण्यासाठी राजस्थान रॉयल्सने रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना संघात सामील करून घेतले. या दोन प्लेयर्समुळे संघातील वेगवेगळ्या समस्या सोडवण्यास मदत झाली आहे. व्यवस्थापनाला विश्वास आहे की, या बदलांमुळे आणि संघात असलेल्या ध्रुव जुरेल आणि वैभव सूर्यवंशी यांसारख्या खेळाडूंच्या कामगिरीमुळे सॅमसनने सोडलेली काही जागा भरून काढता येईल. उदाहरणार्थ, ध्रुव जुरेल विकेटकिपिंग करू शकतो आणि वैभवने गेल्या वर्षी सलामीच्या जागेवर चांगली कामगिरी केली होती.

advertisement

आयपीएल 2026 साठी संघाची रणनीती

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतीची क्रांती पाहायची तर थेट इथं जायचं, पुण्यात भरलंय सर्वात मोठं कृषी प्रदर्शन
सर्व पहा

संघाच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केलं की, प्रत्येक वर्षी आम्ही मागील वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेतो आणि पुढील वर्षासाठी काय सुधारणा करता येतील, याचा विचार करतो. IPL मध्ये 125 कोटींच्या मर्यादेत ट्रॉफी जिंकणारा संघ बनवणे ही तज्ज्ञ आणि मालकांसाठी एक मोठी समस्या असते, कारण प्रत्येक टीमची क्रिकेट खेळण्याची विचारसरणी वेगळी असते. कुमार संगकारा, मनोज आणि संजूने पहिल्यांदा नवीन आव्हान स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यापासून यावर चर्चा करत होतो, असं व्यवस्थापनाने सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : सॅमसनच्या एक्झिटमुळे राजस्थानला टेन्शन! जड्डू नाही तर 'या' दोन खेळाडूंच्या भरोशावर खेळणार आयपीएल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल