हार्दिकच्या निर्णयांवर रोहित नाराज?
मैदानावर हार्दिक पांड्याकडून होत असलेल्या चुकीच्या कॅप्टन्सीवर रोहित शर्मा पूर्णपणे नाखूष असल्याचं गुवाहाटीच्या मैदानात प्रकर्षानं जाणवलं. हार्दिकच्या काही निर्णयांवर रोहित शर्माने जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं असून, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चा विषय ठरला आहे. रोहित आणि हार्दिकची बॉन्डिंग चांगली असल्याने बुमराहच्या ओव्हरला चोप पडल्यानंतर रोहितने उघडपणे हात वर करत नाराजी व्यक्त केल्याचा व्हिडीओ समोर आलाय.
advertisement
बुमराहच्या बॉलिंगनुसार फिल्डिंग सेटअप
मैदानात असलेला अनुभवी रोहित शर्मा वारंवार हार्दिकला काही सुचवताना दिसला. मात्र, जिथं चूक होतीये, तिथं रोहित शर्मा माफी देत नाही. तीन ओव्हरमध्ये 50 धावा केल्यानंतर रोहित शर्माने थेट हात वर करत नाराजी व्यक्त केली होती. कारण बुमराहच्या बॉलिंगनुसार फिल्डिंग सेटअप केला गेला नव्हता. अशातच रोहित शर्माला चूक लक्षात आल्याने त्याने हार्दिकला आपलं म्हणणं सांगितलं.
दरम्यान, वैभव सूर्यवंशी या मॅचमध्ये 278.57 च्या स्टाईक रेटने बॅटिंग केली. त्याने 14 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 1 फोरच्या मदतीने 39 धावा केल्या. तर दुसरीकडे यशस्वी जयस्वाल याने त्याला मोलाची साथ दिली. यशस्वीने 32 बॉलमध्ये 77 धावांनी वादळी केली, ज्यामध्ये त्याने बुमराहला देखील चांगलाच चोप दिला होता. तर कॅप्टन रियान परागने 10 बॉलमध्ये 20 धावा करत राजस्थानला 150 पर्यंत पोहोचवलं होतं.
