न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाची विनंती
न्यूझीलंड दौऱ्यातील वनडे सीरिजचे सामने 3 वरून 5 करण्यात यावेत, अशी विनंती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे केली आहे, असं वृत्त समोर आलं आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे या मागणीचं प्रमुख कारण असल्याचं सांगण्यात येत आहे, कारण दोन्ही खेळाडू आता फक्त वनडे क्रिकेटच खेळत आहेत. विराट आणि रोहित फक्त वनडे खेळत असल्यामुळे चाहत्यांचा कल वनडे क्रिकेटकडे वाढला आहे, त्यामुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ही मागणी केली आहे.
advertisement
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने वेळापत्रक बदलाबाबत बीसीसीआयला आधीच एक योजना सादर केली आहे. भारतीय टीमच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. नोव्हेंबर 2022 पासून टीम इंडिया चार वर्षांत पहिल्यांदाच न्यूझीलंडचा दौरा करणार आहे.
या दौऱ्यातील टेस्ट सीरिज 2025-27 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग असेल. फायनलच्या रेसमध्ये राहण्यासाठी टीम इंडियाला टेस्ट सीरिजमध्ये विजय आवश्यक असेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा आता फक्त वनडे खेळत असल्याने, कोणत्याही क्रिकेट बोर्डाला त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घ्यायचा असेल. दोघांचीही ब्रँड व्हॅल्यू प्रचंड आहे आणि सीरिजच्या सामन्यांची संख्या वाढल्याने प्रसारक, आयोजक आणि क्रिकेट बोर्डाला याचा आर्थिक फायदा होईल, यासाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड 5 वनडे मॅचची सीरिज खेळवायला आग्रही आहे.
