गावस्कर म्हणाले की, "ते खेळाडू म्हणून कितीही महान असले किंवा भारतात कितीही वेळा आले असले, तरी भारतीय संघाची निवड हा त्यांचा विषय नाही. त्यांनी त्यांच्या देशाच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे आणि आम्हाला आमच्या क्रिकेटची चिंता करू द्यावी."
आपल्या लेखात त्यांनी परदेशी खेळाडूंच्या दुटप्पीपणावरही बोट ठेवले. "जेव्हा त्यांच्या देशाची निवड होते, तेव्हा ते सहसा काहीही बोलत नाहीत. मग भारतीय संघाच्या निवडीमध्ये त्यांना नाक खुपसण्याची गरज काय?" असा सवाल त्यांनी विचारला. तसेच, भारतीय माजी क्रिकेटपटू इतर देशांच्या निवडीवर बोलत नाहीत, कारण आम्ही आमच्या कामाशी काम ठेवतो, असेही ते म्हणाले.
advertisement
सोशल मीडिया आणि नकारात्मकता
परदेशी खेळाडूंच्या या वर्तनामागे सोशल मीडियाचे वाढते महत्त्व असल्याचेही गावस्कर यांनी सांगितले. व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी भारतीय क्रिकेटवर नकारात्मक टिप्पणी करणे हा एक सोपा मार्ग बनला आहे. यामुळे भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून मोठी प्रतिक्रिया मिळते आणि त्यातून त्यांचे फॉलोअर्स वाढतात. "याच कारणामुळे अनेक परदेशी क्रिकेटपटूंनी भारतीय क्रिकेटप्रेमींना चिडवून आपले नाव कमावले आहे," असे त्यांनी म्हटले आहे.
