TRENDING:

T20 World Cup : भारत-इंग्लंड सेमी फायनल रद्द झाली तर... फायनलमध्ये कोण जाणार? ICC ने क्लिअर केलाय नियम!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कप 2026 ची पहिली सेमी फायनल दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर भारत-इंग्लंड दुसऱ्या सेमी फायनलमध्ये भिडतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोलकाता : टी-20 वर्ल्ड कप 2026 ची पहिली सेमी फायनल दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना 4 मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेने सुपर 8 च्या ग्रुप ए मध्ये अव्वल स्थान मिळवून सेमी फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. दरम्यान, न्यूझीलंडने ग्रुप बी मध्ये दुसरे स्थान मिळवून सेमी फायनलमध्ये पोहोचली. जर या दोन्ही टीममधील सेमी फायनलचा सामना रद्द झाला तर फायनलला कोणती टीम पोहोचणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे.
भारत-इंग्लंड सेमी फायनल रद्द झाली तर... फायनलमध्ये कोण जाणार? ICC ने क्लिअर केलाय नियम!
भारत-इंग्लंड सेमी फायनल रद्द झाली तर... फायनलमध्ये कोण जाणार? ICC ने क्लिअर केलाय नियम!
advertisement

काय आहे आयसीसीचा नियम?

टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमी फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पावसामुळे ठरलेल्या दिवशी सामना झाला नाही तर राखीव दिवशी हा सामना होईल, पण राखीव दिवशीही मॅच होऊ शकली नाही तर मात्र सामना रद्द केला जाईल. आयसीसीच्या नियमांनुसार, जर सेमी फायनलचा सामना रद्द झाला तर दक्षिण आफ्रिकेला फायनलचे तिकीट मिळेल.

advertisement

आयसीसीच्या नियमांनुसार, सेमी फायनल रद्द झाल्यास, त्यांच्या ग्रुपमधील अव्वल स्थानावर असलेल्या टीमला फायनलचे तिकीट दिले जाईल. दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडविरुद्ध हा फायदा आहे कारण त्यांनी सुपर 8 च्या ग्रुपमध्ये अव्वल स्थान पटकावले होते, तर न्यूझीलंड त्यांच्या ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकाची टीम होती.

भारत-इंग्लंड सेमी फायनलचं काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आल्याचे दर तेजीत, डाळिंबला काय मिळाला भाव?
सर्व पहा

भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या सेमी फायनलसाठीही हाच नियम राहिल. गुरूवार 5 मार्चला होणाऱ्या या सामन्यासाठीही राखीव दिवस आहे, पण त्यादिवशीही सामना झाला नाही तर मॅच रद्द केली जाईल आणि सुपर-8 च्या ग्रुपमध्ये अव्वल टीमला फायनलमध्ये पाठवलं जाईल. टीम इंडिया ही त्यांच्या ग्रुपमध्ये दुसऱ्या आणि इंग्लंड पहिल्या क्रमांकावर राहिली त्यामुळे मॅच रद्द झाली तर इंग्लंड फायनलला जाईल.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : भारत-इंग्लंड सेमी फायनल रद्द झाली तर... फायनलमध्ये कोण जाणार? ICC ने क्लिअर केलाय नियम!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल