काय आहे आयसीसीचा नियम?
टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमी फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पावसामुळे ठरलेल्या दिवशी सामना झाला नाही तर राखीव दिवशी हा सामना होईल, पण राखीव दिवशीही मॅच होऊ शकली नाही तर मात्र सामना रद्द केला जाईल. आयसीसीच्या नियमांनुसार, जर सेमी फायनलचा सामना रद्द झाला तर दक्षिण आफ्रिकेला फायनलचे तिकीट मिळेल.
advertisement
आयसीसीच्या नियमांनुसार, सेमी फायनल रद्द झाल्यास, त्यांच्या ग्रुपमधील अव्वल स्थानावर असलेल्या टीमला फायनलचे तिकीट दिले जाईल. दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडविरुद्ध हा फायदा आहे कारण त्यांनी सुपर 8 च्या ग्रुपमध्ये अव्वल स्थान पटकावले होते, तर न्यूझीलंड त्यांच्या ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकाची टीम होती.
भारत-इंग्लंड सेमी फायनलचं काय?
भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या सेमी फायनलसाठीही हाच नियम राहिल. गुरूवार 5 मार्चला होणाऱ्या या सामन्यासाठीही राखीव दिवस आहे, पण त्यादिवशीही सामना झाला नाही तर मॅच रद्द केली जाईल आणि सुपर-8 च्या ग्रुपमध्ये अव्वल टीमला फायनलमध्ये पाठवलं जाईल. टीम इंडिया ही त्यांच्या ग्रुपमध्ये दुसऱ्या आणि इंग्लंड पहिल्या क्रमांकावर राहिली त्यामुळे मॅच रद्द झाली तर इंग्लंड फायनलला जाईल.
