बीसीसीआयने सोमवारी टीम इंडियाच्या विजयानंतरचा व्हिडिओ शेअर केला. मॅच संपल्यानंतर संजू सॅमसनने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं आणि टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत सेलिब्रेशन केलं, यानंतर संजू ड्रेसिंग रूममध्ये गेला. ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर संजू गुडघ्यांवर बसला आणि हात जोडून प्रार्थना करायला लागला. यानंतर त्याने बॅटचं चुंबन घेतलं.
या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने संजूचं कौतुक केलं. 'मी कायमच म्हणतो चांगल्या लोकांसोबत चांगलं होतं आणि योग्य वेळी होतं. यापेक्षा चांगली वेळ आणि यापेक्षा चांगलं व्यासपीठ कुणासाठीही असू शकत नाही. टीमला जे हवं होतं ते त्याने करून दाखवलं. संजू जेव्हा टीममध्ये आला तेव्हा त्याने ग्रुपला सगळ्यात आधी सांगितलं की असं काहीतरी करूया जे टीमला पाहिजे, ना की तुम्हाला. आयुष्यात आपण खूप काही बघितलं, चढ-उतार. पूर्ण वर्ष काय झालं हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, त्याचं स्थान गेलं, आपली आवडती जागा सोडून त्याला दुसरीकडे बॅटिंग करावी लागली आणि मग पुन्हा तो त्याच्या जागेवर परत आला', असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement
'वर्ल्ड कप जिंकणं सोपं नाही, आयसीसी स्पर्धांमध्ये ज्या मॅच खेळल्या जातात, त्या बहादूर लोकांकडून जिंकल्या जातात. संजूची ही खेळी बहादूर होती. चांगल्या सुरूवातीनंतर तो वाहवत जाऊ शकला असता, पण त्याने एक बाजू सांभाळली. तो टीमला पुढे घेऊन गेला. मी त्याच्यासाठी, त्याच्या पत्नीसाठी त्याच्या कुटुंब आणि चाहत्यांसाठी खूश आहे, जे त्याच्यावर प्रेम करतात. आम्ही फक्त एक पाऊल दूर आहोत. विजयाची घोडदौड सुरू राहिल, अशी अपेक्षा आहे. सांगायला बरंच काही आहे, मी खूप आनंदी आहे', असं वक्तव्य सूर्यकुमार यादवने केलं.
कर्णधार सूर्यकुमार यादवकडून झालेलं कौतुक ऐकून संजू सॅमसनने माहोल हलका केला. 'रुलाएगा क्या पगले', असं संजू सॅमसन कर्णधार सूर्यकुमार यादवला म्हणाला.
