जेकब बेथलने टीम इंडियाच्या सगळ्याच बॉलरवर हल्ला चढवला. टी-20 क्रिकेट क्रमवारीमध्ये नंबर वन बॉलर असलेल्या वरुण चक्रवर्तीने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 64 रन दिल्या तर अर्शदीप सिंगच्या 4 ओव्हरमध्ये 51 रन आल्या. अक्षर पटेलनेही त्याच्या 3 ओव्हरमध्ये 35 रन खर्च केले.
सूर्याने खेळला मास्टरस्ट्रोक
जेकब बेथल मैदानात होता तेव्हा इंग्लंड या सामन्यात चमत्कार करू शकते, असं वाटत होतं, पण कर्णधार सूर्यकुमार यादवने मास्टरस्ट्रोक खेळला. इंग्लंडला शेवटच्या 5 ओव्हरमध्ये विजयासाठी 69 रनची गरज होती, तेव्हा सूर्याने बुमराहच्या हातात बॉल दिला. कॅप्टनचा हा निर्णय बुमराहने योग्य ठरवला आणि त्याने या ओव्हरमध्ये फक्त 6 रन दिले, ज्यामुळे मॅच इंग्लंडच्या हातातून बाहेर गेली.
advertisement
दुबेला चौथ्या क्रमांकावर बॅटिंग
त्याआधी टीम इंडियाची बॅटिंग सुरू असताना संजू क्रीजवर होता तेव्हा सूर्या स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला नाही, त्याऐवजी त्याने शिवम दुबेला पाठवलं. संजू सॅमसन हा उजव्या हाताने बॅटिंग करतो तर शिवम दुबे डावखुरा आहे, त्यामुळे इंग्लंडच्या बॉलर्सची लाईन ऍण्ड लेन्थ खराब करण्यासाठी सूर्याने हा निर्णय घेतला. शिवम दुबेने 25 बॉलमध्ये 172 च्या स्ट्राईक रेटने 43 रनची वादळी खेळी केली, ज्यात 4 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता.
कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यामध्ये खेळलेल्या या दोन मास्टरस्ट्रोकमुळे टीम इंडियाने लागोपाठ दुसऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. आता फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. रविवार 8 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-20 वर्ल्ड कपची फायनल होईल.
