स्कॉटलंड संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी १४७ धावांची भागिदारी केली. तर गोंगाडी त्रिशाने ५९ चेंडूत ४ षटकार आणि १३ चौकारांसह नाबाद ११० धावा केल्या. महिलांच्या १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये शतक करणारी ती जगातील पहिली फलंदाज ठरली आहे. याआधी अशी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही.
advertisement
तिसऱ्या मॅचमध्ये इंग्लंडचे काही खरे नाही! सर्वात घातक गोलंदाजाला दिले स्थान
त्रिशाने या सामन्यात आक्रमक फलंदाजी केली. तिने फक्त २७ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर १८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शतक पूर्ण केले. त्रिशाने ५३ चेंडूत १०० धावा केल्या.
भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटाकत २०८ धावा केल्या. वर्ल्डकपमध्ये ही कोणत्याही संघाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यानंतर फलंदाजीत धमाकेदार कामगिरी केल्यानंतर संघाच्या गोलंदाजांनी कमाल केली. स्कॉटलंडचा फक्त १४ षटकात ५८ धावांवर ऑलआउट केला आणि तब्बल १५० धावांनी विजय साकारला.
भारताकडून आयुषी शुक्लाने 3 षटकांत फक्त आठ धावा देत चार विकेट घेतल्या. वैष्णवी शर्मा आणि गोंगाडी त्रिशा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
सेमीफायलमध्ये आता भारताची लढत इंग्लंडविरुद्ध ३१ जानेवारी रोजी होणार आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी भारताने इंग्लंडचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. आता माजी विजेते आणि उपविजेते सेमीफायनलमध्ये एकमेकांविरुद्ध आले आहेत. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे.
