TRENDING:

Success story: गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली, मातीशी नाळ जोडली! ३९ लाखांचा नफा घेऊन शेतकऱ्यांसाठी बनला प्रेरणा

Last Updated:

Success story: दुष्यंत कुमार सिंह यांनी बंगळूरची नोकरी सोडून सुभाष पाळेकर यांच्या सल्ल्याने बलिया जिल्ह्यात नैसर्गिक शेतीत यश मिळवून लाखोंचा नफा कमावला. प्रेरणादायी संघर्षगाथा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पगार कमी किंवा चांगला असो पण ऑफिसमधील कटकटीला कंटाळून बरेच जण नोकरी सोडून काहीतरी वेगळं करण्याचा विचार करत असतात, कधी आर्थिक ओझामुळे किंवा कधीतरी जबाबदारीमुळे ते प्रत्येकाला शक्य होतंच असं नाही. मात्र काही तरुण त्यातही रिस्क घेतात आणि जेव्हा यश मिळवून दाखवतात तेव्हा नवीन हुरुप येतो, एक प्रेरणा मिळते. कॉर्पोरेटमध्ये घासण्यापेक्षा जर आपल्या शेतात किंवा व्यावसायात तेवढ्या मेहनतीनं काम केलं तर जास्त उत्पन्न मिळू शकतं याची प्रेरणा या अशा लोकांकडून वारंवार मिळत राहाते.
News18
News18
advertisement

बी.टेकची पदवी घेऊन बंगळूरमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि गावी परत येऊन शेतीत लक्ष केंद्रित केलं, तर काय होतं, याचं उत्तम उदाहरण हा तरुण शेतकरी आहे. त्याने हे दाखवून दिलं की शेतीतूनही सोनं उगवू शकतं, पैसे मिळू शकतात. कृषी तज्ज्ञ सुभाष पाळेकर यांचा सल्ला घेऊन शेती सुरू केलेल्या या तरुणाने आता लाखोंचा नफा मिळवून इतर शेतकऱ्यांसाठी एक नवीन आदर्श उभा केला. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील या तरुण शेतकऱ्याची ही संघर्षगाथा प्रेरणादायी आहे.

advertisement

बंगळूरची नोकरी सोडली आणि गावात परतला

बलिया जिल्ह्यातील बसंतपूर गावातील रहिवासी असलेल्या दुष्यंत कुमार सिंह यांनी २०१७ मध्ये बी.टेक. पूर्ण केले. त्यानंतर बंगळूरमध्ये एका खासगी कंपनीत त्यांनी वर्षभर नोकरी केली. मात्र, या नोकरीत त्यांचे मन रमलं नाही. शेवटी, शहराच्या धावपळीतून बाहेर पडायचं असं त्याने मनाशी पक्क केलं आणि त्याने नोकरी सोडली. आपल्या गावी परत येऊन शेतीत काम करण्याचा निर्णय घेतला.

advertisement

सोलापुरात आजही हाताने कोरलं जातं भांड्यावर नाव, कशी आहे पद्धत?

पाळेकरांच्या सल्ल्याने शेतीत उतरला

दुष्यंत सिंह यांच्या यशाची खरी सुरुवात बंगळूरमधील एका शिबिरात झाली, जिथे त्यांची भेट कृषी तज्ज्ञ सुभाष पाळेकर यांच्याशी झाली. पाळेकर यांच्या नैसर्गिक शेतीच्या सल्ल्याने दुष्यंत खूप प्रेरित झाले. त्यांनी पाळेकर यांनी सांगितलेल्या पद्धतीने शेती सुरू केली आणि त्यांची मेहनत फळाला आली. आज दुष्यंत सिंह यांची ओळख उत्तर प्रदेशातील एक यशस्वी आणि प्रतिष्ठित शेतकरी म्हणून झाली आहे.

advertisement

कमी पाणी लागणाऱ्या धानाची निवड

दुष्यंत कुमार सिंह प्रामुख्याने काळा भात ज्याला Black Salt Rice ची शेती करतात. पांढऱ्या भातामुळे सध्या शुगरचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तांबडा भात, काळ्या भाताची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पहिल्यांदा चार बिघा जमिनीवर या धान्याने 60 क्विंटलपर्यंत धान्य आलं. विशेष म्हणजे, मागील चार वर्षांपासून ते काळ्या भाताची लागवड करत असल्याने त्यांना मोठी कमाई केली आहे. त्यांनी केमिकल फ्री शेती केली आहे. कोणत्याही खताचा वापर न करता ते उत्पन्न घेतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

दुष्यंत यांनी आरोग्य लक्षात घेऊन पूर्णपणे नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांना 5000 रुपयांचा एक बिघामागे खर्च आला. यासोबतच ते पशुपालन देखील करतात, ज्यामुळे त्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले सेंद्रिय खत मिळते. एका बिघासाठी त्यांचा सरासरी खर्च ४,००० ते ५,००० रुपये येतो, तर प्रति बिघा ६०,००० रुपये नफा होतो. या हिशोबाने, ६५ बिघांमधून त्यांना ३९ लाख रुपयांपर्यंतचा निव्वळ नफा होण्याची अपेक्षा आहे, तर त्यांचा एकूण लागवड खर्च फक्त ३ लाख रुपये आहे. दुष्यंत यांचे हे यश नोकरीपेक्षा शेतीतही मोठे भविष्य आहे, हे सिद्ध करते.

मराठी बातम्या/Success Story/
Success story: गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली, मातीशी नाळ जोडली! ३९ लाखांचा नफा घेऊन शेतकऱ्यांसाठी बनला प्रेरणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल