एक क्षणात आयुष्य बदललं
वैभव एका सामान्य कुटुंबातून येतात आणि सिडको परिसरात आई व भावासोबत एका पत्र्याच्या घरात राहतात. दहावीत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यानंतर त्यांच्या आईने मजुरी करून घर आणि मुलांचे पालनपोषण केले. २००८ मध्ये, वैभव दहावीत असताना एक वेदनादायक अपघात झाला. पतंग उडवत असताना ते हाय व्होल्टेज विजेच्या तारांच्या संपर्कात आला, ज्यामुळे त्यांचे दोन्ही हात कायमचे निकामी झाले आणि अक्षरशः जळून गेले. या एका क्षणात त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले, पण त्यांनी आपल्या आत्मविश्वासावर आणि जिद्दीवर या अपघाताचे दु:ख कधीही हावी होऊ दिले नाही.
advertisement
पराभवाला नव्हे, पायाने लेखनाला सुरुवात
हाताने लिहिण्याची क्षमता गमावल्यानंतरही स्वतःला दोष देत बसण्याऐवजी वैभव यांनी पायाने लिहिण्याचा सराव सुरू केला. जिद्दीने त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला आणि कठोर परिश्रम व एकाग्रतेने ते दिवसातील अनेक तास अभ्यास करत असत. त्यांच्या याच मेहनत आणि जिद्दीचे फळ त्यांना MPSC परीक्षेत मिळाले. या यशानंतर आता ते मुंबईत महसूल सहायक म्हणून काम करणार आहेत.
संघर्षातून साकारलेले स्वप्न
वैभव यांची ही यशोगाथा केवळ एक परीक्षा उत्तीर्ण होण्याची बातमी नाही, तर ती त्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक ज्वलंत उदाहरण आहे, जो जीवनातील आव्हानांना तोंड देत आपले स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत आहे. वैभव यांची ही सफलता सिद्ध करते की, जर माणूस मानसिकदृष्ट्या मजबूत असेल, तर शारीरिक कमतरता त्याच्या यशाच्या मार्गात अडथळा आणू शकते, पण त्याला यशस्वी होण्यापासून अजिबात रोखू शकत नाही.
अनेक स्वप्नांना प्रेरणा
वैभव पईतवार यांनी केवळ स्वतःचेच स्वप्न पूर्ण केले नाही, तर हजारो तरुणांना प्रेरणा दिली आहे की, संकटांनी कितीही मोठे रूप घेतले तरी, आपल्या आत्मविश्वासावर आणि मेहनतीच्या बळावर यश मिळवता येते. पायाने पेपर लिहून महसूल अधिकारी बनणे, हा केवळ एका व्यक्तीचा प्रवास नसून, तो अपार जिद्द आणि इच्छाशक्तीचा हा सर्वात मोठा विजय आहे.
