विमा कंपन्या आता लहान सायबर सुरक्षा कवच देत आहेत, जे सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांपासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. ही विमा कवच, जी फक्त 3 रुपये प्रतिदिन किमतीत उपलब्ध आहेत, व्यक्ती आणि व्यवसायांना ओळख चोरी, सायबर खंडणी आणि ऑनलाइन गुंडगिरीपासून संरक्षण देतात.
Motorolaने लॉन्च केला सर्वात स्वस्त फोल्डेबल फोन! मिळेल जबरदस्त कॅमेरा, किंमत किती?
advertisement
सायबर फसवणूक कशी होते?
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सायबर गुन्हेगार बनावट व्हिडिओ, व्हॉईस क्लोन किंवा टेक्स्ट मेसेज वापरून कुटुंबातील सदस्य, अधिकारी किंवा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तोतयागिरी करतात. जनरेटिव्ह एआय अत्यंत वास्तववादी दिसणारे व्हिडिओ आणि ऑडिओ तयार करू शकते. HDFC ERGO जनरल इन्शुरन्सचे संचालक पार्थेनिल घोष म्हणाले, 'फसवणूक करणारे AI च्या मदतीने खऱ्यासारखेच फोटो, व्हिडिओ आणि आवाज तयार करून बेकायदेशीर कामांमध्ये गुंतले आहेत.'
Deloitte च्या अलीकडील रिपोर्टनुसार, भारताचा सायबर इन्शुरन्स मार्केट बाजारमध्ये 50-60 मिलियन डॉलरचा होता. पुढील पाच वर्षांमध्ये 27-30% दराने वाढण्याची अपेक्षा आहे. बाजार आणि संबंधित जोखीम वाढत असल्याने, एआय आधारित फसवणुकीसाठी विमा संरक्षण मर्यादित मर्यादेसह ऑफर केले जात आहे.
70% डिस्काउंट! Flipkart वर सुरु होतोय सर्वात 'मोठा सेल', तारीख आणि वेळ आताच नोट करा
आता सायबर गुन्हे केवळ पैशांपुरते मर्यादित नाहीत
यापूर्वी, सायबर जोखिम एसएमएस फिशिंग, फसवे कॉल आणि ओटीपी चोरीपर्यंत मर्यादित होते. आता लोक या पद्धतींपासून सावध झाले आहेत. लॉकटन इंडियाचे सीईओ संदीप दादिया यांच्या म्हणण्यानुसार, "जनरल एआय मधील जोखीम आता आर्थिक नुकसानीपासून पुढे जात प्रतिष्ठेचे नुकसान आणि छळामुळे होणारा भावनिक ताण याच्या पलीकडे जातो." याशिवाय, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा देखील वैयक्तिक डेटाच्या उल्लंघनापासून संरक्षण प्रदान करतो.
उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला
AI तंत्रज्ञान जसजसे प्रगत होते, तसतसे डीपफेक व्हिडिओंची अचूकता देखील वाढते. ज्यामुळे व्हॉइस आणि फेशियल रेकग्निशन यासारख्या पारंपारिक ऑथेंटिकेशन पद्धती यापुढे विश्वासार्ह राहत नाहीत. एचडीएफसीचे घोष म्हणाले की, सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे ही फसवणूक ओळखणे कठीण होते. त्यांची कंपनी नियमितपणे कर्मचाऱ्यांना सायबर धोक्यांबद्दल सतर्क करते आणि डीपफेक कसे शोधायचे याचे प्रशिक्षण देते.
ICICI चे गौरव अरोरा यांच्या मते, विमा संरक्षणाव्यतिरिक्त, संस्थांनी आर्थिक व्यवहार आणि संवेदनशील डेटाचे संरक्षण करण्यासाठी मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू केले पाहिजे आणि संवादातील डीपफेक आणि विसंगती शोधण्यासाठी AI-आधारित साधनांचा वापर केला पाहिजे.