विरारमधील भयानक गुन्ह्याने खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार मांडवी परिसरात राहणारा विजय चव्हाण (वय 30) याचा पत्नीशी वारंवार विवाहबाह्य संबंधाच्या कारणावरून वाद होत होता. या वादातूनच आरोपीने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी त्याने पत्नीचा मृतदेह शेताजवळील एका खाणीत फेकून दिला.
आरोप लवपण्यासाठी केलं काय?
घटनेनंतर विजयने स्वतःला वाचवण्यासाठी पत्नी बेपत्ता झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. त्याने परिसरात शोध घेतल्याचे नाटक केले आणि नातेवाईक आणि पोलिसांकडे पत्नी अचानक गायब झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनीही विजयची तक्रार नोंदवली आणि तपास सुरु केला पण पोलिसांना तपासात महिलेच्या पतीवर संशय आल्याने त्यांनी तपासाची दिशा बदलली.
advertisement
दरम्यानच मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी पोस्टमार्टम केले ज्या अहवालात मृत्यूचे कारण गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. या अहवालामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि विजयची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे समजले.
यानंतर पोलिसांनी आरोपी विजय चव्हाण याला तात्काळ अटक केली. सध्या आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
