संसार सुरू होताच संपला
भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. घरगुती कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन हे टोकाचे पाऊल पतीने उचलल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.
advertisement
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पहिलेचे नाव निर्मला वाघे(वय27) असे असून ती भिवंडीतील कासपाडा या परिसरात तिच्या पतीसोबत राहत होती. गेल्या काही दिवसांपूर्वी निर्मला आणि तिच्या पतीमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. याच भांडणाचा राग पतीच्या मनात होता शेवटी त्याने याच रागातून पत्नीवर हल्ला करत तिची हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पडघा पोलिस तातडीने घटनास्थळी गेली. नंतर आरोपी पती गोरखनाथ वाघे(वय24)याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या गोरखनाथची चौकशी सुरु असून या हत्येमागील नेमके कारण काय होते या सर्व गोष्टींचा तपास पोलिस करत आहेत.
परिसरात घडलेल्या या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र घरगुती वादातून इतक्या टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात संशय निर्माण झालेला आहे.
