मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. सध्या बदलापूर पूर्व-पश्चिम प्रवासासाठी एकमेव उड्डाणपूल असून त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. विशेषत: पावसाळ्यात तर या ठिकाणी प्रवाशांची बिकट स्थिती होते. त्यामुळे शहरात नव्या उड्डाणपुलांची मागणी होत होती.
advertisement
ठाण्यामध्ये 31 मार्चला महत्त्वाची स्पर्धा, दिवसभर वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग?
सध्या बदलापूरचे प्रवेशद्वार असलेल्या बेलवली येथील शिवमंदिर तलाव ते कार्मेल शाळेपर्यंत उड्डाणपूल उभारला जात आहे. त्यासाठीची सर्व प्रक्रिया देखील पार पडली आहे. हा उड्डाणपूल झाल्याने वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. तसेच त्याचा फायदा अंबरनाथच्या चिखलोली परिसर, अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भाग अशा सर्वांना होईल.
...तर कोंडी सुटणार
शिवमंदिर ते कार्मेल शाळा या दरम्यानच्या पुलामुळे काही भागांना फायदा होणार होता. मात्र, बदलापूर पूर्वेतील खरवई, पश्चिमेतील बॅरेज रस्ता परिसरातून प्रवास करण्यासाठी सध्याच्या एकमेव उड्डाणपुलाचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी या परिसरात उड्डाणपुलाची मागणी होत होती.
असा होणार नव्या पुलाचा फायदा
सध्या रमेशवाडी, ऋतु वर्ल्ड ते पूर्वेकडील खरवई परिसरात प्रवासासाठी मोठा वळसा घालावा लागतो. चार ते पाच किलोमीटरचा वळसा घालत बदलापूर गाव आणि स्थानक परिसरातून पूर्वेला जाते. त्यामुळे रेल्वे आणि बस स्थानक परिसर तसेच उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडी होती. नव्या उड्डाणपुलामुळे हा प्रवास अवघ्या काही मिनिटांत होईल.
