कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, महापालिकेने सविस्तर टेक्निकल सर्व्हे करण्याकरिता टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्सची नियुक्ती केली. त्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने पाण्याचा पुरेसा दाब आणि कार्यक्षम वितरण सुनिश्चित करण्यासाठी पारसिक हिल एमबीआर ते महापे जंक्शनपर्यंत सुमारे 14 किमी लांबीची 1500 मिमी व्यासाची एक स्वतंत्र्य मुख्य जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेने वेगाने काम सुरू केले आहे. या योजनेमुळे ऐरोली, दिघा आणि रबाळेसह एमआयडीसी परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा मिळणार आहे.
advertisement
"या प्रकल्पामुळे बाधित भागांना अखंड आणि पुरेसा पाणी पुरवठा सुनिश्चित होईल, ज्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळेल." असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबईतील अनेक रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर अनेक वर्षांनंतर या कामाला ही मंजूरी मिळालेली आहे. 3 फेब्रुवारी रोजी आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम आधीच सुरू झाले असून, ही प्रणाली पूर्ण झाल्यानंतर पाणी वितरण सुव्यवस्थित होईल, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
