
अमरावती : अमरावतीपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेले नया अकोला हे छोटंसं गाव. आता हे गाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांसाठी तीर्थस्थान ठरले आहे. कारण इथेच बाबासाहेबांच्या काही अस्थी जतन करून ठेवलेल्या आहेत. दरवर्षी 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त आणि 9 डिसेंबरला अस्थिस्थापना दिनी येथे हजारो भाविक दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहतात. पण, सगळ्यांना एकच प्रश्न पडतो की, बाबासाहेबांच्या अस्थी येथे आल्या तरी कशा? यामागे एक स्टोरी आहे त्याबाबत जाणून घेऊ.
Last Updated: December 06, 2025, 16:55 ISTहरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पिक आहे. सध्या हे पिक रोप अवस्थेत आहे. या पिकावर अनेक ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. यावर नियंत्रण कसे मिळावावे याबाबतची माहिती पाहुयात यावर्षी हरबरा पेरणी थोडी उशिरा झाली असून, शेवटी झालेल्या पावसाच्या ओलीवर पेरणी झाली आहे, काही ठिकाणी पेरणीला उशीर होत आहे, मागील आठवड्यात थंडी कमी असल्याने हरबरा पिकावर त्याचा परिणाम झाला आहे, आता पुन्हा थंडी वाढलेली आहे. पिकाची वाढ जरा कमी झाली आहे, तसेच बऱ्याच ठिकाणी मर रोग व कॉलर रॉट चा प्रादुर्भाव दिसून येत आहे, बीज प्रक्रिया केली असेल तर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही
Last Updated: December 06, 2025, 20:20 ISTघरातील रोजची कामं करतो म्हणजे वेगळ्या व्यायामाची गरज नाही,' असा अनेक गृहिणींचा गंभीर गैरसमज असतो. मात्र, हा गैरसमज त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. केवळ घरातील कामे करून शरीराला आवश्यक असलेला व्यायाम मिळत नाही. या चुकीच्या समजुतीमुळे गृहिणींचा जीव धोक्यात येतो! वेळीच सदृढ तब्येतीसाठी तुम्ही घरातच कोणती प्रभावी योगासनं सुरू करू शकता, हे लगेच जाणून घ्या!
Last Updated: December 06, 2025, 19:48 ISTसोलापूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय घटनेचे शिल्पकार तथा पददलितांचे तारणहार म्हणून लौकिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील अनेक घरांत त्यांची प्रतिमा असून काहीजण रोज त्यांची पूजा देखील करतात. असंच एक घर सोलापुरात असून गेल्या 70 वर्षांपासून हे पाटील कुटुंब देवदेवतांच्या पूजेआधी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करत आलं आहे. यामागे एक खास कारण असून याबाबतच शिवानंद पाटील यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली आहे.
Last Updated: December 06, 2025, 19:06 ISTमुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. 5 आणि 6 डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमी परिसरात तसेच छत्रपती शिवाजी पार्कवर 100 पेक्षा अधिक पुस्तक विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांनी हे स्टॉल लावले असून वर्धा, नागपूर, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांतील व्यापारी आणि वाचकांची मोठी गर्दी दिसत आहे.
Last Updated: December 06, 2025, 18:01 ISTसोलापूर - महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 साली मुंबई येथे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर त्यांच्या अस्थी कलशांचे महाराष्ट्रातील तीनच ठिकाणी दर्शन होते, मुंबई येथील चैत्यभूमी, नागपूर येथील दीक्षाभूमी यानंतर सोलापूर शहरातील प्रेरणाभूमी आहे. ही प्रेरणाभूमी आजही आंबेडकर अनुयायींना प्रेरणा देण्याचं काम करत आहे. या संदर्भात अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते आतिश बनसोडे यांनी दिली.
Last Updated: December 06, 2025, 17:28 IST