अमरावती : हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होते तेव्हा त्वचेचा ओलावा टिकून राहण्यासाठी त्यावर अनेक उपाय केले जातात. जास्तीत जास्त मुलींकडून विविध प्रॉडक्ट वापरले जातात. पण सर्वाधिक वापरले जाणारे प्रॉडक्ट म्हणजे ग्लिसरीन. हिवाळा सुरू झाला की, ग्लिसरीन आणि गुलाब जल त्वचेवर लावल्याने त्वचा ओलावा धरून राहते असा अनेकांचा समज आहे. आणि तसे होतही असेल. पण तुम्हाला माहिती आहे का? ग्लिसरीन आणि गुलाब जल त्वचेवर लावल्याने आपल्या त्वचेला हानी देखील पोहचते. याबाबत अधिक माहिती आपण त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत.