
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील शिरोडी खुर्द गावातील शेतकरी बाळकृष्ण आटोळे हे गेल्या 10 वर्षांपासून फुलशेती व्यवसायात आहेत. 30 गुंठे क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड त्यांनी केली आहे. जळगाव, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आटोळे यांचा झेंडू पार्सलद्वारे विक्री केला जातो. या झेंडू फुलशेतीच्या माध्यमातून यंदाच्या पहिल्या 2 महिन्यातच 70 हजारांचे उत्पन्न मिळाले असल्याचे बाळकृष्ण आटोळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
Last Updated: Jan 01, 2026, 18:17 ISTपुणे: महाराष्ट्रभरात सध्या चांगलीच कडाक्याची थंडी जाणवत आहे. अनेक भागांत एक अंकी तापमानाचीही नोंद झाली आहे. थंडी सुरू झाली की अनेक जण गंमतीने म्हणतात, खोबरेल तेल आळून बसलं कीच खरी थंडी पडली असं समजायचं. विशेषत: घराघरांत वापरलं जाणारं पॅरॅशूट खोबरेल तेल थंडीत घट्ट होतं. मात्र, यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. खोबरेल तेल थंडीत आळून बसतं, पण बदाम तेल किंवा इतर खाद्यतेलांवर थंडीचा फारसा परिणाम का होत नाही? कितीही थंडी पडली तरी ही तेलं द्रवरूपातच का राहतात? खोबरेल तेल आळून बसण्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि इतर तेलांवर त्याचा परिणाम का होत नाही, याविषयीच आपण जाणून घेणार आहोत.
Last Updated: Jan 01, 2026, 18:01 ISTशिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शीतल देवरुखकर यांनी आज भाजप प्रवेश केला आहे. त्यांना मुंबई पालिका निवडणुकीत उमेदवारी डावलल्यानं त्या नाराज झाल्या. त्यामुळे त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थिती मध्ये भाजप पक्षात प्रवेश केला.
Last Updated: Jan 01, 2026, 17:39 ISTभाजपचे मंत्री नितेश राणे यांना सोशल मीडिया पोस्ट वरुन विरोधकांनी ट्रोल केले. तेव्हा वारिस पठाण यांच्या विधानाचा दाखला देत नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, "हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते. मुंबईचा महापौर मराठीच होणार, हिंदूच होणार आणि आमच्याच पक्षाचा होणार."
Last Updated: Jan 01, 2026, 17:10 ISTमुंबई महापालिकेत उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांना मनसे नेते राज ठाकरेंची भेट घेतली. तेव्हा शर्मिला ठाकरेंनी या उमेदवारांचे औक्षण केले. त्यानंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. ते म्हणाले,"कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. बोगस मतदार सापडला तर फटकावून काढा."
Last Updated: Jan 01, 2026, 16:55 IST