
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात आंबा हे अनेक शेतकऱ्यांसाठी प्रमुख नगदी पीक बनले आहे. दरवर्षी फुलोऱ्यानंतर बागांमध्ये लहान फळांची वाढ सुरू होताच मोठ्या प्रमाणात फळगळ होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. फळे गळल्याने अपेक्षित उत्पादन घटते, दर्जावर परिणाम होतो आणि थेट आर्थिक नुकसान सहन करावे लागते. बदलते हवामान, अनियमित तापमान, पोषणतत्त्वांची कमतरता आणि पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन ही फळगळ वाढण्यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी वेळीच नियोजनबद्ध उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.