छत्रपती संभाजीनगर : जसा ऋतू बदलतो तसा फळ देखील बदलत असतात. ज्या ऋतूमध्ये जे फळ असतात ते खाणे आपण गरजेचे असते. कारण की फळांमधून आपल्याला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, अँटिऑक्सिडंट, मिनरल्स हे घटक भेटत असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आलू बुखारा हे फळ विक्रीसाठी आले आहे. तर या फळाचे काय फायदे होतात? याविषयी माहिती जाणून घेऊयात.