अमरावती: पावसाळ्यामध्ये विविध रानभाज्या मार्केटमध्ये येतात. त्यात वेगवेगळे औषधी गुणधर्म असल्याने सर्वजण ते आवडीने खातात. त्यातीलच एक म्हणजे अंबाडीची भाजी. ही भाजी पचनशक्ती वाढविण्यास मदत करते. तसेच रक्त शुद्धीकरण देखील करते. त्यामुळे पावसाळ्यात एकदा तरी ही भाजी आहारात घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. ही भाजी बनविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अंबाडीची भाजी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची? त्याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी मंदा बहुरूपी यांनी दिली आहे.