अमरावती: पावसाळ्यात सायंकाळच्या वेळी नाश्त्यासाठी काहीतरी चटपटीत पाहिजे असते. अशावेळी जास्तीत जास्त भजी आणि इतर काही पदार्थ बनवले जातात. मूग आणि बरबटीची डाळ वापरून वडेसुद्धा बनवले जातात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे तांदूळ आणि डाळीच्या साध्या खिचडीपासून तयार होणारे वडे. हे वडे खाण्यासाठी टेस्टी लागतात. कढी आणि खिचडीचे वडे हा बेत असल्यास नाश्त्याला कोणीच नाही म्हणणार नाही. खिचडीचे वडे कसे बनवायचे? याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी जया भोंडे यांनी दिली आहे.