
जळगाव : आपली मातृभाषा मराठी जशी वळणा-वळणावर बदलते, तसं आपल्या राज्याच्या खाद्यसंस्कृतीतही वैविध्य आढळतं. वडापाव, भाकरी अन् ठेचा हे तर सर्वांच्याच आवडीचे पदार्थ. मात्र यासह महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ मोठ्या चवीनं खाल्ले जातात. खान्देशातील वरण बट्टी आणि वांग्याच्या भाजीचा बेत म्हणजे जणू तृप्तीचा ढेकर.
Last Updated: November 11, 2025, 14:42 ISTमुंबई: सध्या मधुमेह म्हणजे डायबेटीस हा आजार अगदी तिशीतल्या तरुण-तरुणींनाही होताना पाहायला मिळतो. स्थूलता, पोटाचा वाढलेला घेर, शरीरात वाढलेली चरबीची पातळी ही डायबेटीसची लक्षण असू शकतात. तर, जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळेही टाईप 2 मधुमेहाचा धोका संभवतो. तसेच ताणतणाव, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि लठ्ठपणा या तिन्ही गोष्टी मधुमेहासाठी जबाबदार आहेत. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनाही मधुमेहाचा धोका असतो. त्यामुळे प्रत्येकानं जीवनशैलीतील चुकांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या संदर्भात मुंबईतील एंडोक्राइनोलॉजिस्ट, डायबेटोलॉजिस्ट तथा वैद्यकीय संशोधक डॉ. शशांक जोशी यांनी अधिक माहिती दिली आहे.
Last Updated: November 11, 2025, 15:52 ISTछत्रपती संभाजीनगर : कोणताही पदार्थाला मिठाशिवाय चव येत नाही. जेवणात मीठ नसेल तर तो पदार्थ खायला चांगला लागत नाही. कोणताही पदार्थ मिठाशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे आपण दररोजच्या जेवणामध्ये मीठ हे वापरत असतो. जेवण बनवताना पांढरा मिठाचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे आपण कोणते मीठ खावे? कोणते मीठ किती प्रमाणात खावे? याबद्दलच छत्रपती संभाजीनगरमधील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 11, 2025, 14:57 ISTग्राहकांकडून कोणत्याही जमिनींचा किंवा इतर मालमत्तेचा व्यवहार होतो. तेव्हा त्यावर काही कर आकारला जातो. हा कर निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेच्या व्यवहारावर आकारला जातो. हा कर का आणि किती आकारला जातो ह्याबाबतची अधिक माहिती 'लोकल 18' शी बोलताना ॲडव्होकेट पृथ्वीराज पातळे यांनी दिली.
Last Updated: November 11, 2025, 14:07 ISTहिवाळ्याचा कडाका वाढू लागला आहे आणि त्यासोबतच कोरड्या त्वचेच्या तक्रारींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. थंड वाऱ्यामुळे आणि कमी आर्द्रतेमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतोय. त्यामुळे कधी कधी त्वचा कोरडी, निस्तेज आणि कधी कधी खाज सुटते. विशेषतः चेहरा, हात, पाय आणि ओठ यावर याचा अधिक परिणाम दिसून येतो. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातही थंडीचा परिणाम जाणवत असून अनेकांना त्वचा फुटण्याची समस्या निर्माण झाली आहे.
Last Updated: November 11, 2025, 13:30 IST