
जालना : राज्यात पावसाने माघार घेताच कडाक्याची थंडी जाणवत आहे. हिवाळा सुरू झाल्याने त्वचा कोरडी पडणे, रखरखीत होणे, ओठ फुटणे यांसारख्या समस्या वाढतात. अशावेळी जवळपास प्रत्येकजण मार्केटमधील वेगवेगळे मॉइश्चरायझर वापरतात. परंतु आपल्या रोजच्या जीवनशैलीत केलेले महत्त्वाचे बदल देखील आपल्याला त्वचेच्या समस्यांपासून दूर ठेवू शकतात. याबाबत माहिती जालना येथील सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अमृता कुलकर्णी यांनी दिली आहे.