
मुंबई: सध्या नोकरीपेक्षा व्यवसायाला जास्त प्राधान्य दिलं जातं. अशाच पद्धतीने अंधेरीतील इरफान खान आणि सौरभ गुंजाळ या दोन मित्रांनीही नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. दोघांची मैत्री बारा वर्षांची असून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अनेक रेस्टॉरंटमध्ये एकत्र काम केलं. काम करताना दोघांची स्टाईल, समज आणि टीमवर्क चांगलं जुळलं आणि म्हणून एकत्र व्यवसाय करायचा प्लॅन तयार झाला.