
सध्या राजकीय वातावरण जोरदार तापलेलं दिसत आहे. पालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना बिनविरोध उमेदवारांवरुन सगळ्याच पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. २९ पालिकांमध्ये ७० उमेदवार बिनविरोध निवडून आले यामुळे सगळ्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यातच आता बिनविरोधला मनसेचा तीव्र विरोध आहे. या प्रकरणी मनसेने कोर्टात धाव घेतली आहे.