गुजरातच्या कच्छमधील ही घटना भुजच्या समत्रा गावातील. धनजीभाईची दुसरी बायको तिचंही हे दुसरं लग्न होतं. पहिल्या पतीसोबत तिचा घटस्फोट झाला होता. धनाजीभाईंशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीने त्यांच्या पहिल्या मृत पत्नीचे 18 तोळे दागिने स्वतःला घेतले. या दोघांच्या लग्नाला दीड वर्षे उलटली होती.
एका मुलीची आई, एकाच वेळी 2-2 मुलांसोबत ठेवले संबंध, भयानक शेवट
advertisement
एके दिवशी धनजीबाईच्या बायकोने त्याच्याकडे पैसे मागितले त्याने दिले नाहीत, म्हणून ती भडकली. आज तुला जिवंत सोडणार नाही, असं म्हणत ती नवऱ्याला घराच्या गॅरेजमध्ये घेऊन केली. तिथं तिने रॉकेल ओतलं आग लावली आणि गॅरेजचा दरवाजा बंद करून ती वर घरात निघून गेली.
गॅरेजमधून आगीचा धूर बाहेर आला, ओरडण्याचा आवाज येऊ लागला म्हणून आजूबाजूचे लोक तिथं धावत आले. त्यांनी पाहिलं तर धनजीभाई आगीच्या विळख्यात होते. त्यांना तात्काळ भुजच्या के जी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांचा वाचवण्याचे सगळे प्रयत्न केले पण ते अपयशीस ठरले. धनजीभाईला वाचवता आलं नाही, त्याचा मृत्यू झाला.
तिला पाहताच लट्टू झाला, लगेच लग्नाच्या बोहल्यावर चढला; सुहागरातनंतर पस्तावतोय नवरा
मृत्यूआधी त्याने पोलिसांना माहिती दिली. पत्नीने जिवंत जाळल्याचं त्याने सांगितलं. मनकुवा पोलिसांनी त्याच्या पत्नीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आणि तिला अटक केली, अशी माहिती कच्छचे डीवायएसपी मिनेष क्रिश्चियन यांनी दिली.