उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील हे प्रकरण आहे. रावतपूर येथील रहिवासी असलेल्या महिलेचं लग्न मार्च 2024 मध्ये उन्नाव जिल्ह्यातील एका तरुणाशी झालं होतं. लग्नाच्या पहिल्या रात्री वधू तिच्या पतीकडे प्रेमाने पाहते आणि हळू हळू त्याच्या जवळ बसते. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं पण नंतर वधूने तिच्या वराचा हात धरताच तो तिचा हात झटकून टाकतो आणि भडकतो. लग्नाच्या पहिल्याच रात्री महिलेला समजलं की तिचा पती नपुसंक आहे.
advertisement
हनीमूनसाठी आसुसलेला नवरदेव! सकाळी कोर्टात लग्न, पहिल्याच रात्री मृत्यू, नेमकं काय घडलं?
तिने दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या मोठ्या जावेला याबाबत सांगितलं, पण तिने ते मस्करीत घेतलं. काही दिवसांनी महिलेने पुन्हा हा विषय काढला तेव्हा तिच्या सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. महिलेच्या म्हणण्यानुसार, सासरच्यांनी कबूल केलं की त्यांना आधीच सर्व काही माहित होतं आणि हे लग्न फक्त हुंड्यासाठी केलं गेलं होतं.
जेव्हा महिला तिच्या पतीवर उपचार करण्याबद्दल बोलली तेव्हा तिच्या सासरच्यांनी तिच्याकडून 2 लाख रुपयांची मागणी केली. महिलेला आशा होती की परिस्थिती सुधारेल, म्हणून ती तिथंच राहू लागली. पण तिच्या दीराची तिच्यावर वाईट नजर होती. त्याने तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. तिने विरोध केला तेव्हा तिला बेदम मारहाण करण्यात आली.
Suhagraat News : सुहागरातआधी नवरदेवाला फुटला घाम, वडिलांकडे धावत गेला, म्हणाला, बाबा... बाबा...
महिलेने आरोप केला आहे की जेव्हा तिला तिच्या माहेरच्यांनी बोलण्यासाठी बोलावलं, तेव्हा तिला फाशी देण्याचा प्रयत्न करण्यात आला जेणेकरून प्रकरण सोडवण्याऐवजी तिला संपवता येईल. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी पती, दीर आणि जावेविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.