TRENDING:

'गूंग महल' जिथं गेले आणि 12 मुलांचा आवाज कायमचा हरपला! ना कधी बोलू शकले, ना समजू शकले; नेमकं झालं काय?

Last Updated:

Gung Mahal : एक प्रसिद्ध पॅलेस. जो पाहण्यासाठी कित्येक पर्यटक येतात. पण या महालाची कहाणी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ही घटना 16 व्या शतकाच्या उत्तरार्धातील. इतिहासात धार्मिक सहिष्णुता आणि बुद्धिमतेसाठी प्रसिद्ध असलेले शहंशाह अकबर यांनी एक प्रयोग केला. ज्यामुळे 12 मुलांचं आयुष्य कायमचं बदललं. या प्रयोगामुळे ते कायमचे मूक झाले. काही अहवालांमध्ये ही संख्या 12 मुलांची होती, तर काहींमध्ये 20-30.
News18
News18
advertisement

या प्रयोगाचा उद्देश मानव जन्मतःच भाषा घेऊन जन्माला येतो की नाही हे ठरवणं होता.  त्या वेळी विद्वान भाषा ही जन्मजात आहे की शिकलेली आहे यावर वाद घालत होते. मुलं ऐकल्याशिवाय संस्कृत, अरबी किंवा हिब्रूसारखी नैसर्गिक भाषा बोलू शकतात का? की भाषा ऐकून आणि शिकून आली होती?

काही इतिहासकारांच्या मते, अकबराचा असा विश्वास होता की भाषा ऐकल्याने येते, म्हणून ऐकल्याशिवाय मुलं मूक राहतील. इतर आवृत्त्यांमध्ये असं म्हटलं आहे की तो एक आदिम भाषा शोधत होता, जी देवाने मानवतेला दिली असेल. बदायुनीसारख्या टीकाकारांनी याचा संबंध अकबराच्या धार्मिक कुतूहलाशी जोडला, मुलं कोणती धार्मिक भाषा बोलतील हे पाहण्याची त्यांची इच्छा होती.

advertisement

अख्खं विमान खाक, कपलचा मृत्यू; पण प्लेन क्रॅशमध्ये श्वान मात्र बचावला; कसा झाला चमत्कार?

अकबराने प्रयोगाद्वारे या प्रश्नाचं उत्तर देण्याचा निर्णय घेतला. त्याने गुंग महाल किंवा गोबर महाल नावाचा एक वेगळा राजवाडा बांधला, जिथं नवजात बाळांना ठेवलं जात असे. या बाळांची काळजी मूक परिचारिकांवर सोपवण्यात आली होती, ज्यांना मुलांशी कधीही बोलू नये किंवा कोणताही आवाज करू नये अशी कडक सूचना देण्यात आली होती. राजवाड्यातील कोणालाही बोलण्याची परवानगी नव्हती. मुलांना भाषेपासून पूर्णपणे वंचित ठेवण्यात आलं होतं, जेणेकरून ते स्वतःशी कोणती भाषा बोलतील किंवा पूर्णपणे शांत राहतील हे पाहता येईल.

advertisement

1578 च्या सुमारास सुरू झालेला हा प्रयोग सुमारे 3-4 वर्षे चालला. 1582 मध्ये अकबर स्वतः राजवाड्याला भेट देत होता. पण निकाल निराशाजनक होता.  त्याने पाहिलं की मुलं एकही शब्द बोलत नव्हती. रडत नव्हती, ओरडत नव्हती, संभाषण करत नव्हती. फक्त मूक आवाज आणि हावभाव.

India Border : भारताच्या बॉर्डरवर लटकवलेल्या आहेत काचेच्या रिकाम्या बाटल्या, कारण काय?

advertisement

मुघल दरबारातील इतिहासकार अबुल फजल यांचे ऐन-ए-अकबरी आणि अकबरनामा या प्रयोगाबाबत सांगण्यात आलं आहे. अबुल फजलने लिहिलं, "कोणताही जादूचा प्रयोग झाला नाही, फक्त मुक्यांचे आवाज."

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata आता करणार मार्केट जाम, आणली 468 किमी मायलेजदार SUV; किंमतही 6 लाखांपासून
सर्व पहा

मनोरंजक म्हणजे, गंग या शब्दाचा अर्थ केवळ मुका नव्हता तर जो हावभावांनी बोलतो असा देखील होता. मुक्या परिचारिका कदाचित एकमेकांना हावभाव करत असत आणि बाळांनीही ते पाहिलं म्हणून मौखिक मौखिक भाषा नाही तर त्यांच्यात एक प्रकारची सांकेतिक भाषा विकसित झाली.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
'गूंग महल' जिथं गेले आणि 12 मुलांचा आवाज कायमचा हरपला! ना कधी बोलू शकले, ना समजू शकले; नेमकं झालं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल