India Border : भारताच्या बॉर्डरवर लटकवलेल्या आहेत काचेच्या रिकाम्या बाटल्या, कारण काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Empty Glass Bottles On Indian border : भारताच्या सीमेवर सैनिक काटेरी तारांच्या कुंपणावर रिकाम्या काचेच्या बाटल्या लटकवतात, जे दिसायला साधं वाटत असलं तरी आजही ते सीमा सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
advertisement
advertisement
भारताच्या बॉर्डचा भाग असा आहे, जिथं सर्वत्र हाय-टेक सेन्सर किंवा कॅमेरे बसवणं सोपं नाही. सीमेच्या अनेक भागात वीज नेहमीच असते असं नाही. पाऊस, बर्फवृष्टी किंवा खराब हवामानात हाय-टेक सिस्टम बिघडू शकते. अशा परिस्थिती काचेच्या बाटल्या उपयोगी ठरतात. त्यांना वीज, बॅटरी किंवा नेटवर्कची गरज नसते. ते कोणत्याही हवामानात 24 तास कार्यरत असतात.
advertisement
advertisement
जेव्हा एखादी व्यक्ती, घुसखोर किंवा वन्य प्राणी तारेला स्पर्श करतात किंवा ती ओलांडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा लटकलेल्या बाटल्या एकमेकांवर आदळतात, ज्यामुळे मोठा आवाज होतो. रात्रीच्या शांततेत हा आवाज दूरवर ऐकू येतो. सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी ते एक इशारा म्हणून काम करते, ज्यामुळे ते लगेच सतर्क होतात.








