पण एका व्यक्तीसोबत एक विचित्र प्रकार घडला, ज्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत आहे. खरंतर या व्यक्तीने हजारो लोकांना आपल्या घरच्या कार्यक्रमाला आमंत्रण दिलं होतं. पण असं असलं तरी कोणीही त्याच्या कार्यक्रमाला आलं नाही. या मागचं कारण देखील तसंच आहे.
आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न येईल की असं का? नक्की काय घडलं असावं? चला या प्रकरणाबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या लग्नाची पार्टी आयोजित केली होती. तो माणूस त्याच्या संपूर्ण कुटुंबासह गावाबाहेर राहत होता. पण लग्नासाठी त्याने आपले गाव निवडले. त्या व्यक्तीने सर्वांना तोंडी घरी येण्याचे आमंत्रण दिले. लग्नाच्या दिवशी त्यांनी एका मोठ्या मैदानात सर्व व्यवस्था केली. सुमारे शंभर टेबल्स लावण्यात आले आणि हजार लोकांसाठी जेवण तयार करण्यात आले. मात्र गावातील एकही व्यक्ती लग्नाला आली नाही. मुलाच्या आईने कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सर्वांनाच धक्का बसला.
या लग्नाची बातमी चीनी मीडिया HK01 वर दाखवण्यात आली. रिकाम्या शेतात शंभर टेबल्स धूळ खात असताना दिसत आहे. पाहुण्यांसाठी बसण्यापासून ते स्वादिष्ट भोजनापर्यंतची व्यवस्था करण्यात आली होती. पण लग्नाला कोणी आले नाही. जेव्हा वराच्या आईने याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला कळले की, तिचे कुटुंबीय गावात कोणाच्या घरी झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते, त्यामुळेच त्यांनीही तिच्या घरी लग्नाला हजेरी लावली नाही.
या लग्नात तिला खूप त्रास सहन करावा लागल्याचे वराच्या आईने सांगितले. एक तर अन्नाचीही नासाडी झाली आणि दुसरे म्हणजे त्यांची बदनामीही झाली. या लग्नात आपल्या हजारो पाहुण्यांपैकी एकही पाहुणे सहभागी होणार नाही याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती.
