झाशी जिल्ह्यातील मौरानीपूर इथलं सुखवती आणि कामता प्रसाद हे कपल. त्यांची दोन मुलं, दोघांचंही लग्न झालेलं. दोन सुना, 2 नातवंडं. असं हे आनंदी कुटुंब. कुटुंब मजुरी करत होतं, पण त्यांचा संसार सुखाने चालू होता. पण नंतर असं काही घडलं ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता.
अडीच वर्षांपूर्वी भिंड जिल्ह्यातील एका वीटभट्टीवर काम करत असताना सुखवती रथ तहसीलमधील बिहुनी गावातील रहिवासी अमर सिंग प्रजापतीला भेटली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांचं फोनवर बोलणं, गुपचूप भेटणं सुरू झालं.
advertisement
75 वर्षांच्या आजोबांनी 35 वर्षीय महिलेशी केलं लग्न, सुहागरात ठरली शेवटची रात्र, सकाळी मृत्यू
वीटभट्टी कामगार असलेला सुखवतीचा नवरा कामता प्रसादला पत्नीच्या अफेअरबाबत समजलं होतं. तो म्हणाला, पत्नी सुखवतीसोबत त्याचं आयुष्य सुरळीत चाललं होतं. दोन मुलांसह, त्यांच्या पत्नी आणि चार नातवंडांसह आनंदाने राहत होते. पण अडीच वर्षांपूर्वी तीअमर सिंह प्रजापतीला भेटली. नंतर दोघंही गुप्तपणे भेटू लागले. कामताने तिला वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण सुखवती काही ऐकली नाही.
अलीकडेच जेव्हा कामता आपल्या मुलाच्या उपचारासाठी झाशीला गेला तेव्हा सुखवतीने संधी साधली आणि घरातील सुनेचे दागिने, रोख रक्कम आणि इतर सामान घेऊन ती अमर सिंहसह पळून गेली. जाताना तिने सुनांचे दागिने आणि सुमारे 40000 रुपये रोख रक्कमही नेली जी तिच्या सुनेसाठी ठेवण्यात आली होती.
एकाच कुटुंबातील 11 सदस्यांना मृत्यूदंड, 11 जणांना जन्मठेप, गुन्हा असा की सैतानही घाबरेल
कामता प्रसाद, त्याचा मुलगा, सून आणि नातवंडांसह मौरानीपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचला.
पोलीस ठाण्यात रडत कामता म्हणाला, "ती एवढं टोकाचं पाऊल उचलेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आमची नातवंडे असह्य आहेत. सुनांचे दागिने हे त्यांचे अलंकार होते आणि त्यांच्या प्रसूतीसाठी 40 हजार रुपये वाचवले होते. आता आपण काय करणार?"
कुटुंबासह पोलीस ठाण्यात आलेल्या मुलाने आणि सुनेनी सुखवतीवर विश्वासघाताचा आरोपही केला. मुलगा म्हणाला, "आईच्या कृतीने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. आम्ही मजूर म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करतो. आता हा धक्का कसा सहन करायचा?"
आजोबांनी ठेवलं नातीचं नाव! कोर्टात पोहोचलं प्रकरण, पालकांची होणार DNA टेस्ट, पण का?
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे आणि तपास सुरू केला आहे. मौरानीपूर पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी सांगितलं की, कामता प्रसादच्या तक्रारीवरून अमर सिंगविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 406 (गुन्हेगारी विश्वासघात) आणि 420 (फसवणूक) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुखवतीला सह-आरोपी करण्यात आलं आहे. भिंड, मोरेना आणि आसपासच्या भागात पोलीस पथकं छापे टाकत आहेत. अमर सिंगच्या बिहुनी गावातही तपास सुरू आहे. प्रकरण संवेदनशील आहे. दोघांनाही लवकरच अटक केली जाईल. कुटुंबाला न्याय मिळेल.