रेल्वेचं नेटवर्क संपूर्ण भारतभर पसरलेलं आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जायचं असेल तर ते शक्य होतं.
पण रेल्वेनं सुखाने आणि कोणताही त्रास न करता प्रवास करायचा असेल तर त्यासाठी कन्फर्म तिकिट असणं आवशक आहे. यासाठी तुम्हाला दोन महिने आधी रेल्वेचं तिकिट काढावं लागतं.
पण कधीकधी तिकिट काढायला उशीर झाल्यामुळे लोकांची तिकिट वेटिंगवर असते. अशावेळी कोणत्या परिस्थीतीत ही वेटिंग तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता जास्त असते? असा प्रश्न अनेकांना उद्भवतो. तर आपातकालीन परिस्थीतीत रेल्वेचं तिकिट कन्फर्म मिळू शकतं.
advertisement
आपत्कालीन कोटा म्हणजे काय (What is emergency quota in train)?
भारतीय रेल्वेमध्ये आपत्कालीन परिस्थितींसाठी काही सीट्स आरक्षित ठेवल्या जातात. यामध्ये केंद्रीय मंत्री, खासदार, न्यायधीश आणि इतर उच्चस्तरीय व्यक्तींसाठी राखीव असतात. याशिवाय सरकारी कार्य, कुटुंबातील शोक, गंभीर आजार, किंवा नोकरीसाठी मुलाखत अशा कारणांसाठी प्रवास करणाऱ्या लोकांना प्राथमिकता दिली जाते.
आपत्कालीन कोटामध्ये तिकिट कन्फर्म मिळण्यासाठी काय करायचं (How to confirm my waiting list ticket in the emergency quota)?
-आपल्या जवळच्या मंत्रालय, झोनल ऑफिस किंवा डिव्हिजन ऑफिसमध्ये जा.
- आपत्कालीन कोट्यासाठी अर्ज करा.
- आपली गरज स्पष्ट करा (उदाहरणार्थ, परीक्षा, गंभीर आजार इत्यादी).
- आपल्या वेटिंग टिकटची कॉपी आणि आपत्कालीन प्रमाणपत्र जोडून द्या.
- अर्ज संबंधित कार्यालयात द्या.
- आपल्या अर्जामध्ये मोबाइल नंबर द्यावा.
प्रतिकात्मक फोटो (How many seats are in emergency quota)?
प्रत्येक ट्रेनमध्ये 10 स्लीपर कोच असलेल्या ट्रेनमध्ये प्रत्येक कोचमध्ये 18 सीट्स आरक्षित असतात, त्यामुळे एकूण 180 सीट्स कन्फर्म होऊ शकतात. हाच नियम थर्ड एसी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसीसाठी देखील लागू आहे.
