advertisement

अरे देवा! सूर्यग्रहण संपताच ४ राशींचे ग्रहमान फिरले, मोठी संकटं येणार, प्रचंड नुकसान होणार

Last Updated:

Astrology News : फेब्रुवारी महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानला जातो. या कालावधीत ग्रहांच्या हालचालींमुळे अनेक राशींच्या आयुष्यात बदलांची चाहूल लागते.

Astrology News
Astrology News
मुंबई : फेब्रुवारी महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानला जातो. या कालावधीत ग्रहांच्या हालचालींमुळे अनेक राशींच्या आयुष्यात बदलांची चाहूल लागते. याच महिन्यात वर्षातील पहिले सूर्यग्रहण घडत असून, ग्रहणानंतर अवघ्या दोन दिवसांत सूर्याची नक्षत्रीय चाल बदलणार आहे. ज्योतिषींच्या मते, 17 फेब्रुवारीच्या सूर्यग्रहणानंतर 19 फेब्रुवारी रोजी सूर्य राहूच्या प्रभावाखाली शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. या संक्रमणामुळे काही राशींना विशेष सतर्क राहण्याची गरज भासू शकते. जीवनातील विविध क्षेत्रांवर आरोग्य, आर्थिक व्यवहार, नातेसंबंध आणि करिअर याचे परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
सूर्यग्रहणानंतर ग्रहस्थितीत उलथापालथ
सूर्यग्रहणानंतर होणारे नक्षत्र परिवर्तन हे सामान्य बदल मानले जात नाही. शतभिषा नक्षत्र राहूशी संबंधित असल्याने अचानक निर्णय, मानसिक अस्थिरता आणि गैरसमज वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे काही राशींनी या काळात संयम, सावधगिरी आणि विवेक राखणे आवश्यक आहे.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ चढ-उतारांचा ठरू शकतो. दैनंदिन कामकाजात घाईगडबड टाळावी लागेल. वाहन चालवताना किंवा प्रवासात विशेष खबरदारी आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारात कुणावरही अंधविश्वास ठेवू नका; गुंतवणूक किंवा पैसे उधार देण्याआधी सर्व बाजूंनी विचार करा. घरातील वातावरणातही तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संवादात संयम ठेवा.
advertisement
उपाय: दररोज सकाळी सूर्य बीज मंत्राचा जप केल्यास सकारात्मकता वाढेल.
कन्या राशी
कन्या राशीच्या व्यक्तींना व्यावसायिक आयुष्यात सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. कार्यालयीन राजकारण, गैरसमज किंवा अनावश्यक वाद यांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. सहकाऱ्यांशी संवाद करताना शब्दांची निवड महत्त्वाची ठरेल. कौटुंबिक आयुष्यातही लहान गोष्टींवरून वाद होऊ शकतात.
उपाय: रोज तांब्याच्या भांड्यातून सूर्याला पाणी अर्पण केल्याने मनःशांती लाभेल.
advertisement
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकतो. आत्मविश्वास डळमळीत होण्याची शक्यता असून, त्यामुळे निर्णयक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. प्रवासात काळजी घ्या आणि करिअरशी संबंधित मोठे निर्णय तातडीने घेणे टाळा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल.
उपाय: सूर्य मंत्राचा नियमित जप केल्याने मानसिक बळ मिळेल.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. दिनचर्या विस्कळीत झाल्यास थकवा किंवा किरकोळ आजार उद्भवू शकतात. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. रागावर नियंत्रण ठेवल्यास नातेसंबंध टिकून राहतील.
advertisement
उपाय: तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
अरे देवा! सूर्यग्रहण संपताच ४ राशींचे ग्रहमान फिरले, मोठी संकटं येणार, प्रचंड नुकसान होणार
Next Article
advertisement
Grampanchayat Election: गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' तारखांवर ठेवा लक्ष
गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' त
  • राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे.

  • गावगाड्याचा कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे.

  • येत्या २० फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

View All
advertisement