advertisement

मालिकेला अचानक ब्रेक, पण जोडी कायम! 'पारू' नंतर अहिल्यादेवी-श्रीकांत पुन्हा एकत्र

Last Updated:
पारू मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मालिकेतील फेमस जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
1/10
'झी मराठी'वरील 'पारू' ही मालिका अचानक बंद झाली. मालिका संपणार आहे हे मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांनाही माहिती नव्हतं. मालिकेचा शेवटचा एपिसोडही व्यवस्थित झाला नाही.
'झी मराठी'वरील 'पारू' ही मालिका अचानक बंद झाली. मालिका संपणार आहे हे मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांनाही माहिती नव्हतं. मालिकेचा शेवटचा एपिसोडही व्यवस्थित झाला नाही.
advertisement
2/10
मालिका बंद झाल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती.  मालिकेतील कलाकारांनाही मालिका बंद झाल्यानंतर व्हिडीओ शेअर करत नाराजी व्यक्त केली होती. 
मालिका बंद झाल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती.  मालिकेतील कलाकारांनाही मालिका बंद झाल्यानंतर व्हिडीओ शेअर करत नाराजी व्यक्त केली होती. 
advertisement
3/10
दरम्यान पारू मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मालिकेतील एक फेमस जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या नाटकात ही जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 
दरम्यान पारू मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मालिकेतील एक फेमस जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या नाटकात ही जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 
advertisement
4/10
पारू या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक ही जोडी नव्या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  अनेक दशके इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमी गाजवणारे, 'हिंग्लिश' नाटकांचे जनक आणि प्रसिद्ध 'अॅड गुरु' भरत दाभोळकर आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत.
पारू या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक ही जोडी नव्या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  अनेक दशके इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमी गाजवणारे, 'हिंग्लिश' नाटकांचे जनक आणि प्रसिद्ध 'अॅड गुरु' भरत दाभोळकर आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत.
advertisement
5/10
लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिहेरी भूमिकेतून ते 'कॅरी ऑन स्पायगिरी' या नाटकाद्वारे प्रथमच मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवत आहेत. अभिनेते आकाश भडसावळे यांच्या 'सवाईगंधर्व' आणि 'अभिजात' या दोन संस्थांची ही निर्मिती आहे.
लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिहेरी भूमिकेतून ते 'कॅरी ऑन स्पायगिरी' या नाटकाद्वारे प्रथमच मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवत आहेत. अभिनेते आकाश भडसावळे यांच्या 'सवाईगंधर्व' आणि 'अभिजात' या दोन संस्थांची ही निर्मिती आहे.
advertisement
6/10
अभिनेते विजय पटवर्धन म्हणाले,
अभिनेते विजय पटवर्धन म्हणाले, "कॅरी ऑन SPYगिरी हे माझं 58 वं व्यावसायिक नाटक. या नाटकातून मी नि मुग्धा कर्णिक पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहोत. मुळात म'ग्धा आणि माझी गट्टी 'घोळात घोळ' या नाटकापासून जमली. आम्हाला एकमेकांच्या कामाच्या पद्धतीची आणि 'टायमिंग'ची अचूक कल्पना असल्याने, 'कॅरी ऑन SPYगिरी' मध्येही प्रेक्षकांना आमची तीच सहज केमिस्ट्री पाहायला मिळेल."
advertisement
7/10
 "मालिका आणि नाटकात जमीन-अस्मानचा फरक असतो; नाटकाचा प्रेक्षक पूर्णपणे तुमच्या समोर असतो, त्याला दोन तास खिळवून ठेवणं हे नटाचं खरं कसब असतं. आजच्या टेन्शनने भरलेल्या आयुष्यात विनोदी नाटक हा सर्वोत्तम विरंगुळा आहे. 'कॅरी ऑन SPYगिरी' नाटकात भरत सरांसोबत काम करण्याचा अनुभव भन्नाट असून त्यांच्या 'ब्लॅक ह्युमर'ची शैली प्रेक्षकांचा नक्कीच हशा वसूल करेल."
"मालिका आणि नाटकात जमीन-अस्मानचा फरक असतो; नाटकाचा प्रेक्षक पूर्णपणे तुमच्या समोर असतो, त्याला दोन तास खिळवून ठेवणं हे नटाचं खरं कसब असतं. आजच्या टेन्शनने भरलेल्या आयुष्यात विनोदी नाटक हा सर्वोत्तम विरंगुळा आहे. 'कॅरी ऑन SPYगिरी' नाटकात भरत सरांसोबत काम करण्याचा अनुभव भन्नाट असून त्यांच्या 'ब्लॅक ह्युमर'ची शैली प्रेक्षकांचा नक्कीच हशा वसूल करेल."
advertisement
8/10
अभिनेत्री मुग्धा कर्णिक म्हणाल्या,
अभिनेत्री मुग्धा कर्णिक म्हणाल्या, "मराठी रंगभूमीला सध्या सुगीचे दिवस असून हे नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवायला तयार आहे. विजय आणि मी 'पारू' मालिकेमुळे गेल्या दोन वर्षांपासून एकत्र आहोत. ज्याचा फायदा नाटकाच्या तालमीतही होतोय.
advertisement
9/10
 "मालिकेतली आमची पात्रं आणि या नाटकातली पात्रं एकमेकांच्या पूर्णपणे टोकाची आहेत. या नाटकाला दाभोळकरी 'पॅटर्न' मिळाल्यामुळे हे नाटक अजून खुलून निघालं आहे. भरत सरांची काम करण्याची पद्धत अत्यंत अभ्यासू असून त्यांच्या लिखाणातील 'राजकीय भाष्य' नाटकाला एक वेगळीच उंची देतं. नाटकाच्या तालमींदरम्यान त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळत आहे."
"मालिकेतली आमची पात्रं आणि या नाटकातली पात्रं एकमेकांच्या पूर्णपणे टोकाची आहेत. या नाटकाला दाभोळकरी 'पॅटर्न' मिळाल्यामुळे हे नाटक अजून खुलून निघालं आहे. भरत सरांची काम करण्याची पद्धत अत्यंत अभ्यासू असून त्यांच्या लिखाणातील 'राजकीय भाष्य' नाटकाला एक वेगळीच उंची देतं. नाटकाच्या तालमींदरम्यान त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळत आहे."
advertisement
10/10
या नाटकात अभिनेते विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक यांच्याबरोबर अभिनेते मोहन आझाद, विजय पटवर्धन, मुग्धा कर्णिक, राहुल पेठे, आकाश भडसावळे, सुयश पुरोहित, गीतांजली गणगे, गौरव निमकर आणि स्वतः भरत दाभोळकर अशा तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. 10 एप्रिल 2026 रोजी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई येथे आणि तर 18 एप्रिल 2026 रोजी बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत. 
या नाटकात अभिनेते विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक यांच्याबरोबर अभिनेते मोहन आझाद, विजय पटवर्धन, मुग्धा कर्णिक, राहुल पेठे, आकाश भडसावळे, सुयश पुरोहित, गीतांजली गणगे, गौरव निमकर आणि स्वतः भरत दाभोळकर अशा तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. 10 एप्रिल 2026 रोजी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई येथे आणि तर 18 एप्रिल 2026 रोजी बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत. 
advertisement
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement